On This Day in 1986: डेब्यूच्या 54 वर्षांनंतर भारताने लॉर्ड्स मैदानावर मिळवला होता पहिला विजय, कपिल देव यांनी षटकार ठोकून बनविले होते विजयी

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 10 जूनच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आजच्याच दिवशी भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर प्रथमच कसोटी सामना जिंकला. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 10 जून 1986 रोजी इंग्लंडचा 5 विकेटने पराभव करून इतिहास रचला होता.

On This Day in 1986: डेब्यूच्या 54 वर्षांनंतर भारताने लॉर्ड्स मैदानावर मिळवला होता पहिला विजय, कपिल देव यांनी षटकार ठोकून बनविले होते विजयी
भारत-इंग्लंड 1986 लॉर्ड्स टेस्ट (Photo Credit: Twitter/ICC)

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 10 जूनच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आजच्याच दिवशी भारतीय संघाने (Indian Team) लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर प्रथमच कसोटी सामना जिंकला. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 10 जून 1986 रोजी इंग्लंडचा (England) 5 विकेटने पराभव करून इतिहास रचला होता. इंग्लंडविरुद्ध 1932 पदार्पणाच्या मध्ये पहिला कसोटी सामना खेळल्याच्या 54 वर्षानंतर 1986 मध्ये पहिल्यांदा लॉर्ड्समध्ये विजयी होण्याची भारताची पहिलीच वेळ होती. लॉर्ड्सला क्रिकेटचा मक्का म्हणतात आणि तेथे जिंकणे क्रिकेटमध्ये हजच्या बरोबरीचे आहे. 1986 मध्ये जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौर्‍यावर गेला तेव्हा पहिल्या कसोटी सामन्यात असा अनपेक्षित विजय मिळेल असे कोणालाही वाटले नव्हते. या सामन्यात इंग्लिश संघाने पहिल्या डावात 294 धावा केल्या, त्या प्रत्युत्तरात भारतीय संघाचा पहिला डाव 341 धावांवर संपुष्टात आणला. यानंतर इंग्लंडचे फलंदाज दुसर्‍या डावात 180 धावांवर ऑलआऊट झाले. अशा परिस्थितीत भारताला सामना जिंकण्याची मोठी संधी होती आणि त्यांनी दुसऱ्या डावात 5 विकेट गमावून 136 धावांचे लक्ष्य गाठले आणि इतिहास रचला. (On This Day in 2019: विराट कोहलीने स्टीव्ह स्मिथसाठी वर्ल्ड कपमध्ये दाखवलेल्या खेळाडूवृत्तीने जिंकली फॅन्सची मनं, ICC नेही केला गौरव Watch Video)

या सामन्याचे नायक राहिले भारताचे कर्णधार कपिल देव (Kapil Dev). देव यांनी मैदानावर पाऊल ठेवला आणि पहिल्याच चेंडूवर त्या शॉटमुळे हा सामना खूपच थरारक बनवला. लॉर्ड्समध्ये 11 प्रयत्नानंतर देवने 10 चेंडूत नाबाद 23 धावा फटकावून भारताला पहिला कसोटी विजय मिळवून दिला. देव यांना सामनावीरचा पुरस्कार मिळाला. भारताकडून या सामन्यात दिलीप वेंगसरकर यांनी पहिल्या डावात नाबाद 126 धावांसह भारताच्या विजयाचा पाया रचला. लॉर्ड्स येथे सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये शतक ठोकणारे वेंगसरकर पहिले खेळाडू ठरले. दुसरीकडे, हा सामना इंग्लंडच्या मधल्या फळीतील डेविड गॉवरच्या कर्णधारपदाचा शेवट होता.

दरम्यान, वेंगसरकर यांनी भारताच्या दुसर्‍या डावातही सर्वाधिक 33 धावा केल्या. तर, कपिल यांनी पहिल्या डावात एक धाव व्यतिरिक्त एक विकेट घेतली आणि दुसऱ्या डावात त्यांनी नाबाद 23 धावांसह 4 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात देवने 10 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह भारताला विजय मिळवून दिला.

(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2020 10:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).