IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतच्या एका चुकीच्या निर्णयाची मोठी किंमत मोजली, कर्णधारने Tim David विरुद्ध DRS न घेण्याचे कारण केले स्पष्ट

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मार्गावर होती, परंतु मुंबई इंडियन्सकडून पाच विकेट्सने पराभूत झाल्यामुळे त्यांचा प्लेऑफ विक्रम मोडीत निघाला. खराब सुरुवातीनंतर सामन्यात पुनरागमन करण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करूनही, एका निर्णयातील त्रुटीमुळे सामना दिल्ली कॅपिटल्सच्या हातून निसटला.

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतच्या एका चुकीच्या निर्णयाची मोठी किंमत मोजली, कर्णधारने Tim David विरुद्ध DRS न घेण्याचे कारण केले स्पष्ट
रिषभ पंत (Photo Credit: Twitter/@StarSportsIndia)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 आवृत्तीच्या 69 क्रमांकाच्या मॅचमध्ये शनिवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना झाला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला आणि त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करू दिला नाही आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला प्ले ऑफचे तिकीट भेट म्हणून दिले. खराब सुरुवातीनंतर सामन्यात पुनरागमन करण्यासाठी दिल्लीचे सर्वोत्तम प्रयत्न केले असूनही निर्णयातील त्रुटीमुळे सामना दिल्ली कॅपिटल्सच्या हातातून निसटला. हे सर्व दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) मुंबई इंडियन्सच्या डावाच्या 15 व्या षटकात टीम डेविड (Tim David) विरुद्ध DRS न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा घडले. (IPL 2022, MI vs DC: अखेर शेवट गोड करताना मुंबईचा 5 विकेट्सने दिमाखदार विजय, दिल्ली कॅपिटल्सचा गाशा गुंडाळला; RCB च्या झोळीत प्लेऑफचे तिकीट)

ऋषभ पंतला संघ व्यवस्थापनाचा, मुख्य प्रशिक्षकाचा पूर्ण पाठिंबा आहे पण शेवटच्या साखळी सामन्यात त्याने केलेल्या चुकांमुळे त्याच्या संघाचे नुकसान झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झंझावाती खेळी खेळणारा डेविड पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता, पण पंतने डीआरएस घेतला नाही आणि नंतर टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू बॅटच्या कडेला लागल्याचे दिसुन आले. सामन्यानंतर पंतने निर्णयाचे पुनरावलोकन करण्यासाठी थर्ड अंपायरकडे का गेला नाही हे स्पष्ट केले. पंत म्हणाला की डेविडच्या बॅटला बॉल लागला होता की नाही याची मला खात्री नव्हती म्हणून त्याने इनपुटसाठी आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला. पंत पुढे म्हणाले की, 30-यार्ड वर्तुळात उभ्या असलेल्या प्रत्येकाला खात्री होती की डेविडच्या बॅटला चेंडू लागला नाही आणि म्हणून त्याने मैदानावरील पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले नाही. सामना गमावल्यावर पंतने स्पष्टीकरण देत म्हटले, “ मला वाटले की काहीतरी आहे पण त्यानंतर प्रत्येकाला पुरेशी खात्री पटली नाही म्हणून मी त्यांना ‘आपण वर जावे का’ असे विचारत होतो आणि शेवटी मी रिव्ह्यू घेतला नाही,” पंत त्याच्या सामन्यानंतरच्या मुलाखतीत म्हणाले.

दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मार्गावर होती, परंतु मुंबई इंडियन्सकडून पाच विकेट्सने पराभव झाल्यानंतर त्यांचा प्लेऑफचा विक्रम मोडीत निघाला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाला आता त्यांची पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी आणखी एक वर्ष वाट पाहावी लागेल. कॅपिटल्सने स्पर्धेच्या इतिहासात कधीही आयपीएल हंगाम जिंकला नाही तथापि, श्रेयस अय्यर आणि रिकी पाँटिंग या तत्कालीन कर्णधार-प्रशिक्षक जोडीच्या नेतृत्वात 2020 मध्ये अंतिम फेरी गाठली.

(The above story first appeared on LatestLY on May 22, 2022 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).