India vs England 2021: भारत-इंग्लंड दरम्यान होणार पिंक बॉल टेस्ट; BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली स्थानाची पुष्टी, जाणून घ्या कधी व कुठे होणार मुकाबला

पुढील वर्षाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड क्रिकेट टीम दरम्यान डे-नाईट गुलाबी बॉल टेस्ट रंगेल, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान इंग्लंड टीम पाच कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौर्‍यावर येणार आहे.

India vs England 2021: भारत-इंग्लंड दरम्यान होणार पिंक बॉल टेस्ट; BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली स्थानाची पुष्टी, जाणून घ्या कधी व कुठे होणार मुकाबला
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Photo Credits: PTI)

India vs England 2021: पुढील वर्षाच्या सुरुवातीला अहमदाबाद (Ahmedabad) येथे भारत (India) आणि इंग्लंड क्रिकेट टीम (England Cricket Team) दरम्यान डे-नाईट गुलाबी बॉल टेस्ट (Day/Night Pink Ball Test) रंगेल, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी वृत्तसंस्था PTIला दिली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान इंग्लंड टीम पाच कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौर्‍यावर येणार आहे. “अहमदाबाद येथे डे-नाईट टेस्ट होईल,” गांगुली यांनी कोलकाता प्रेस क्लब येथे माकपचे आमदार अशोक भट्टाचार्य यांच्या पुस्तकाचे उद्घाटन करताना सांगितले. गेल्या काही काळात भारतात कोविड-19 प्रकरणातील वाढीमुळे, सध्या आयपीएल 2020 सुरु असलेल्या युएईमध्ये (UAE) ही मालिका स्थलांतरित केली जाऊ शकते असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु इंग्लंड मालिकेचे देशात आयोजन करण्याच्या बीसीसीआय निर्धारात आहे आणि जैव-सुरक्षित बाबा तयार करण्यासह सर्व शक्य पर्यायांचा शोध घेत आहेत. (India tour of Australia 2020: ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर 5व्या वेगवान गोलंदाजासाठी मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्यात लढत)

कसोटी मालिकेसाठी अहमदाबाद, धर्मशाला आणि कोलकाता हे तीन स्थान असण्याची शक्यता आहे, परंतु गांगुली यांनी सांगितले की त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घ्यायचा आहे. या मालिकेच्या संभाव्य स्थळांबद्दल विचारले असता गांगुली म्हणाले: “आम्ही काही तात्पुरती योजना तयार केल्या आहेत पण अद्याप काहीही झाले नाही. आमच्याकडे अद्याप चार महिने वेळ आहे.” गांगुली यांनी असेही म्हटले आहे की बीसीसीआय आताच्या आगामी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर अधिक लक्ष केंद्रित करीत आहे.

“इंग्लंडपूर्वी आमच्याकडे ऑस्ट्रेलिया मालिका येत आहे. काही दिवसांत संघ निवडला जाईल,” गांगुली म्हणाले. आयपीएलनंतर त्वरित कसोटी स्वरूपाकडे जाणे खेळाडूंना कठीण जाईल का, असे विचारले असता माजी कर्णधार म्हणाले: “ते सर्व दर्जेदार खेळाडू आहेत, ते ठीक आहेत.” दुसरीकडे, बीसीसीआयने देशांतर्गत हंगामापर्यंत 1 जानेवारीपासून रणजी करंडक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम) याबाबतचा तपशील तयार केला जाईल, असे गांगुली यांनी सांगितले. “एजीएम लवकरच होईल आणि तेथे आम्ही रणजी ट्रॉफी विषयी निर्णय घेऊ.”

(पीटीआय इनपुटसह)

(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2020 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).