IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यावर हे 3 भारतीय गोलंदाज यजमान फलंदाजांसाठी ठरू शकतात कर्दनकाळ
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL Series 2021: भारत आणि न्यूझीलंड संघातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 फायनल सामन्यानंतर आता सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष श्रीलंका दौर्‍यावर (Sri Lanka Tour) गेलेल्या भारतीय युवा ब्रिगेडवर अवलंबून आहेत. टीम इंडिया (Team India) येथे यजमान संघाविरुद्ध अनुक्रमे तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या आगामी दौऱ्यासाठी भारतीय संघात (Indian Team) अनुभवी खेळाडूंसह अनेक युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. फलंदाजीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे मर्यादित ओव्हरचे अनुभवी खेळाडू आहेत तर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, राहुल चाहर असे गोलंदाज आहेत, जे विरोधी संघासाठी कर्दनकाळ ठरू शकतात. (IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर या 6 नवख्या खेळाडूंवर असणार नजर, टीम इंडिया XI मध्ये कोणाला मिळणार संधी)

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

श्रीलंका दौर्‍यासाठी टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कुमारच्या घातक गोलंदाजीने सर्वच परिचित आहे आणि त्याला खेळपट्टीवर थोडी मदत मिळाल्यास तो श्रीलंकन फलंदाजांचा काळ ठरू शकतो.

दीपक चाहर (Deepak Chahar)

भारताचा 28 वर्षीय वेगवान गोलंदाज दीपकने थोड्याच वेळात आपल्या शानदार गोलंदाजीने लोकांना प्रभावित केले आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीने चांगल्या फलंदाजांनाही धावांची संघर्ष करावा लागला आहे. अशा परिस्थितीत तो श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीपकच्या नावावर एक हॅट्रिक देखील आहे.

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

भारताचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलच्या फिरकीला सर्वच ओळखून आहे. मैदानात चहलच्या फिरकीने जादू केल्यास विरोधी संघाला गुंडाळण्यात टीम इंडिया फार काळ लागणार नाही. चहलने आतापर्यंत 54 वनडे सामन्यात 27.3 च्या सरासरीने 92 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 48 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळत त्याच्या नावावर 25.4 च्या सरासरीने 62 विकेट्सची नोंद आहे.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे या दौऱ्यावर प्रभावी कामगिरी करत निवड समितीला खुश करून काही खेळाडू युएई येथे होणाऱ्या आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात प्रवेश करू शकतात. शिवाय, या दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणाऱ्या राहुल द्रविड यांनी देखील यापूर्वी याबाबत पुष्टी केली होती की किमान दोन खेळाडू भारताच्या टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळवू शकतात.