MI vs RR: आयपीएल साठी ऐतिहासिक क्षण, 1000 व्या सामन्यात मुंबई आणि राजस्थान यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना
आयपीएल 2023 चा 42 वा सामना जो मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात खेळला जाईल हा या लीगच्या इतिहासातील 1000 वा सामना आहे. या विशेष सामन्यासाठी विशेष तयारी सुरू झाली आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) ची ऐतिहासिक 16 वी आवृत्ती सुरू आहे. ही लीग 2008 मध्ये सुरू झाली होती. आयपीएल 2023 चा 42 वा सामना जो मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात खेळला जाईल हा या लीगच्या इतिहासातील 1000 वा सामना आहे. या विशेष सामन्यासाठी विशेष तयारी सुरू झाली आहे. हा सामना भारतातील मुंबईतील सर्वात लोकप्रिय स्टेडियम वानखेडे येथे होणार आहे. सध्याच्या स्थितीच्या तुलनेत राजस्थानचा संघ बलाढय़ दिसत असला तरी मुंबईच्या संघाने आतापर्यंत सर्वांनाच खडतर स्पर्धा दिली आहे. हा हाय व्होल्टेज सामना रविवार, 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजेपासून खेळवला जाईल. (हे देखील वाचा: CSK vs PBKS Live Streaming: आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमनेसामने, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना ?)
मुंबई आणि राजस्थान आमने-सामने
या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने आठ सामने खेळले असून पाच विजयानंतर संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे सात सामने खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने तीन जिंकले असून चार पराभव पत्करले आहेत. राजस्थानचा संघ सीएसकेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून आला होता, तर मुंबईला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. हे दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जुन्या संघांपैकी एक आहेत. 2008 साली जेव्हा लीग सुरू झाली तेव्हा राजस्थानचा संघ चॅम्पियन बनला होता. तर मुंबई इंडियन्सने 2013, 15, 17, 19 आणि 20 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
कसा आहे हेड टू हेड रेकॉर्ड ?
आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण 29 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 15 सामने जिंकले असून राजस्थानने 13 वेळा विजय मिळवला आहे. 2008 मध्ये पहिल्यांदा दोन्ही संघांमध्ये लढत झाली होती ज्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता. 2013 पर्यंत दोन्ही संघांमध्ये निकराची लढत झाली होती आणि दोघांनी 6-6 विजय नोंदवले होते. यानंतर मुंबईचा जादुई काळ सुरू झाला पण त्यानंतर राजस्थानने पाचवेळच्या चॅम्पियन संघाविरुद्ध 17 पैकी 9 सामने जिंकले आहेत. या मोसमातील उभय संघांमधील हा पहिला सामना असेल.
कसा होता आयपीएलचा सुवर्ण प्रवास?
2008 मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा टी-20 क्रिकेटची फारशी कल्पना नव्हती. 2007 मध्येच, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पहिला विश्वचषक खेळला गेला. आयपीएल सहा महिन्यांनी सुरू झाले. त्या मोसमानंतर ही क्रिकेट लीग जगभर गाजू लागली. पहिला हंगाम राजस्थान रॉयल्सने जिंकला होता, त्यानंतर डेक्कन चार्जर्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघांनी 15 वर्षांपासून किमान एकदा तरी ट्रॉफी जिंकली होती. मुंबई पाच वेळा तर चेन्नई चार वेळा चॅम्पियन ठरली. केकेआरने या लीगची ट्रॉफी दोनदा जिंकली. याशिवाय सनरायझर्स, डेक्कन, राजस्थान आणि गुजरातने प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावले आहे. राजस्थान हा या लीगचा पहिला विजेता आहे आणि मुंबई सर्वात यशस्वी संघ आहे. आता या दोन संघांमध्ये या लीगचा ऐतिहासिक 1000 वा सामना रंगणार आहे. या सामन्याचा थरार शिगेला जाऊ शकतो.
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2023 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

