Virat Kohli Reacts On India's Loss: टी-20 विश्वचषकातुन भारतीय संघ बाद झाल्यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना, म्हणाला..

रोहितच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर अनेक भारतीय चाहत्यांनी भारतीय संघाल ट्रोल केलं तर काही जण भारतीय संघाच्या पाठीशी उभे राहिले.

Virat Kohli Reacts On India's Loss: टी-20 विश्वचषकातुन भारतीय संघ बाद झाल्यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना, म्हणाला..
Virat Kohli (Photo Credit - Twitter)

गुरूवारी झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा (Team India) इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव झाला. रोहितच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर अनेक भारतीय चाहत्यांनी भारतीय संघाल ट्रोल केलं तर काही जण भारतीय संघाच्या पाठीशी उभे राहिले. या सगळ्या गोष्टीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला "आम्ही आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियन किनारा सोडत आहोत आणि आमच्या अंतःकरणात निराशा आहे, परंतु आम्ही एक गट म्हणून अनेक अविस्मरणीय क्षण परत घेत आहोत आणि येथून चांगले होण्याचे ध्येय आहे. धन्यवाद. आमचे सर्व चाहते जे मोठ्या संख्येने आम्हाला स्टेडियममध्ये पाठिंबा देण्यासाठी आले. ही जर्सी परिधान करून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा नेहमीच अभिमान वाटतो.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2022 11:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).