IND vs BAN 1st Test Day 3: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, बांगलादेशला विजयासाठी 471 धावांची गरज; बांगलादेशचा स्कोर 42/0
टीम इंडियाने वेगवान फलंदाजी करताना दुसरा डाव 258 धावांवर घोषित केला. सलामीवीर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने शानदार शतके झळकावली. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 512 धावा कराव्या लागतील.
IND vs BAN 1st: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. त्याचवेळी बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून मुशफिकर रहीमने सर्वाधिक 28 धावा केल्या. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 5 बळी घेतले. टीम इंडियाने वेगवान फलंदाजी करताना दुसरा डाव 258 धावांवर घोषित केला. सलामीवीर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने शानदार शतके झळकावली. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 512 धावा कराव्या लागतील. दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने विकेट न गमावता धावा केल्या आहेत. बांगलादेशला विजयासाठी अजूनही 471 धावांची गरज आहे. सलामीवीर नजमुल हुसेन शांतो 25 आणि झाकीर हसन 17 धावा करून खेळत आहेत. बांगलादेशचा स्कोर 42/0 असा आहे.
That's Stumps on Day 3 of the first #BANvIND Test!
Bangladesh move to 42/0 after #TeamIndia secured a 512-run lead!
We will be back for Day 4 action tomorrow.
Scorecard ▶️ https://t.co/CVZ44NpS5m pic.twitter.com/scqMCXxlG2
— BCCI (@BCCI) December 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 16, 2022 04:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

