IND vs SL, Asia Cup 2022: रोहित शर्माने खेळली 72 धावांची कर्णधार खेळी, भारताने श्रीलंकेसमोर ठेवले 174 धावांचे लक्ष्य
प्रथम खेळताना भारताने 8 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावा केल्या आहेत.
टीम इंडिया आज T20 आशिया कपमधील सर्वात मोठा सामना खेळत आहे. सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. सुपर-4 मध्ये श्रीलंकेने विजयाने सुरुवात केली. प्रथम खेळताना भारताने 8 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. म्हणजेच टीम इंडिया प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 8 विकेट्सवर 173 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी खेळली. त्याने 41 चेंडूत 72 धावा केल्या. 5 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. मात्र, अखेरच्या 5 षटकांत केवळ 46 धावा झाल्या. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतने 17-17 धावांचे योगदान दिले. अश्विनने 7 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या.
Innings break!
A valuable 2 runs for India to end their innings after Wanindu drops a catch.
IND 173/8 after 20 ov
Sri Lanka need 174 to win!#SLvIND #ACC #AsiaCup2022 #GetReadyForEpic
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2022 09:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

