INDvsENG: 'नाण्याला दोन बाजू असतात...'; भारताच्या पराभवानंतर Sachin Tendulkar ने दिली प्रतिक्रिया (See Tweet)
भारताचा आज झालेला पराभव अनेक चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. सोशल मिडियावर याबाबत चर्चेला ऊत आला आहे.
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता 13 नोव्हेंबरला त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताने ठेवलेले 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने 4 षटके बाकी असताना एकही बिनबाद 170 धावा केल्या. भारताचा आज झालेला पराभव अनेक चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. सोशल मिडियावर याबाबत चर्चेला ऊत आला आहे. अशात महान क्रिकेटर सचिन तेंडूलकर याने आजच्या सामन्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिन म्हणतो, 'नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे जीवनालाही. जर आपण आपल्या संघाचे यश आपले यश असल्यासारखे साजरे केले, तर आपण आपल्या संघाचे नुकसानही सहन करू शकलो पाहिजे. आयुष्यात दोघेही हातात हात घालून चालतात.
A coin has two sides, so does life.
If we celebrate our team’s success like our own then we should be able to take our team's losses too…
In life, they both go hand in hand.#INDvsENG
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2022 10:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

