IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील (IND vs BAN) तिसरा आणि शेवटचा सामना चट्टोग्राम येथे सुरू आहे. मालिका गमावलेला भारतीय संघ या सामन्यात आपली इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर बांगलादेश क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशला 410 धावांचे लक्ष्य दिले आहे. इशान किशनच्या 210 आणि विराट कोहलीच्या 113 धावांच्या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने 8 विकेट्सवर 409 धावा केल्या होत्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)