महाराष्ट्रात अनेक भागांत उन्हाचा कडाका तीव्र होत आहे. सध्या पाण्याचे बाष्पीभवन लवकर होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी भागामध्येही महिलांना पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. राय पाडा भागामध्ये अनेक महिला पायपीट करत पाणी आणत असल्याचं भीषण वास्तव एप्रिल महिन्यातच दिसू लागलं आहे.

भिवंडी मध्ये पाण्यासाठी महिलांची पायपीट

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)