राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले असुन मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आहे. तसेच सरकार मध्ये 160 पेक्षा जास्त आमदार असुनही मंत्रिमंडळ विस्तार अजून होत का नाही आहे अशी टीका विरोधकांकडून होत असते. यावर आता शिवसेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी सरकारची दखल घेत राज्यपालांना सवाल केला आहे. संजय राऊत ट्विट करुन म्हटले आहे की, “भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही राज्यपाल, हे काय सुरू आहे ?” असे ट्विट राऊतांकडून करण्यात आलंय. त्यामुळे आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवरती दबाही वाढताना दिसत आहे.
Tweet
भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही
राज्यपाल,
हे काय सुरू आहे ? pic.twitter.com/SZtUpMzVjy
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)