Chhatrapati Shivaji Maharaj Hospital:रुग्णालयाच्या आत येण्याचा रस्ता मोठा, मात्र बाहेर जाण्याचा रस्ता फक्त वरती; 17 बळींनंतर आव्हाड भडकले
रुग्णालयात डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्यांची मोठी कमतरता असल्याने उपचाराअभावी या सर्वांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रकारावरुन जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) रोष व्यक्त करत ठाणे प्रशासनावर आणि राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये (Thane Hospital) आत जाण्याचा रस्ता मोठा आहे, पण हॉस्पिटलच्या आतमधून बाहेर येण्याचा रस्ता फक्त वरती आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यापूर्वी 10 ऑगस्टच्या रात्री याच रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्यांची मोठी कमतरता असल्याने उपचाराअभावी या सर्वांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
पाहा ट्विट -
ठाण्यातील शिवाजी हॉस्पिटल मध्ये आत येण्याचे सगळे दरवाजे उघडे आहेत पण जाण्यासाठी फक्त वरचा दरवाजा उघडा आहे
श्रीराम जयराम#१७मृत्यू
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 13, 2023
आज सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं.
आज… pic.twitter.com/7mAhAnOJiL
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2023 03:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

