Balbharati 55th Anniversary: बालभारती आज 55 वर्षांची झाली, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा!
शाळांमध्ये आधुनिक, नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त अध्ययन-अध्यापन पद्धती पोहोचाव्यात यासाठी बालभारतीने केलेले अनेक सुसंगत बदल संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी पुरक ठरले आहेत. भविष्यातही बालभारती आपला हा लौकिक कायम राखणार, असा मला विश्वास आहे. संस्थेच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
मागील ५५ वर्षांच्या वाटचालीत बालभारतीने (Balbharati 55th Anniversary) आपल्या 'सा विद्या या विमुक्तये' (Sa Vidya Ya Vimuktaye) या ब्रीदवाक्याशी बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या विकासाला बळ देणारी पाठ्यपुस्तके आणि इतर नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य तयार करण्यात दिलेले योगदान गौरवास्पद असेच आहे, अशा भावना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी व्यक्त केल्या आहेत. शाळांमध्ये आधुनिक, नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त अध्ययन-अध्यापन पद्धती पोहोचाव्यात यासाठी बालभारतीने केलेले अनेक सुसंगत बदल संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी पुरक ठरले आहेत. भविष्यातही बालभारती आपला हा लौकिक कायम राखणार, असा मला विश्वास आहे. संस्थेच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांना ज्ञानाचा समृद्ध वारसा देणारे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजेच तुम्हा-आम्हा सर्वांच्या लाडक्या बालभारतीचा आज ५५वा स्थापना दिन!हस्तलिखित पुस्तकांपासून अक्षर ओळख करून देणाऱ्या ते डिजिटल रूप घेतलेल्या बालभारतीला स्थापना दिनाच्या शुभेच्छा! pic.twitter.com/nzML5ZFde2
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 27, 2022 11:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

