Rahul Gandhi on Odisha Train Accident: अपघाताची जबाबदारी घेण्यापासून मोदी सरकार पळ काढू शकत नाही, राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टिका
ओडिशातील बालासोर येथील भीषण अपघातानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेल्वे मंत्री यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे.
ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1000 हून अधिक प्रवासी जखमी झाले. मदत आणि बचाव कार्य आता संपले असून रेल्वेचे झालेले नुकसान आणि अपघात घडलेल्या रेल्वे मार्गांच्या दुरुस्तीचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, विरोधी पक्ष जोरदार आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या अपघातानंतर केंद्र सरकारवर टिका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे की, "270 पेक्षा अधिक मृत्यूनंतरही जबाबदारी नाही, अशा वेदनादायक अपघाताची जबाबदारी घेण्यापासून मोदी सरकार पळ काढू शकत नाही. पंतप्रधानांनी तातडीने रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागावा" अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाहा ट्विट -
270+ मौतों के बाद भी कोई जवाबदेही नहीं!
मोदी सरकार इतनी दर्दनाक दुर्घटना की ज़िम्मेदारी लेने से भाग नहीं सकती।
प्रधानमंत्री को फ़ौरन रेल मंत्री का इस्तीफा लेना चाहिए!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2023 06:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

