Indus Waters Treaty: पाकिस्तानला 1960 च्या सिंधू जल करारात बदल करण्यासाठी भारताने बजावली नोटीस
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पाकिस्तानसोबतच्या सिंधू पाणी करारावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भारताने 25 जानेवारीला पाकिस्तानला नोटीस बजावली आहे.
सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करारात सुधारणा करण्याबाबत भारताने पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानसोबत सिंधू जल कराराची अंमलबजावणी करण्यासाठी भारत हा दृढ समर्थक, जबाबदार भागीदार आहे, परंतु पाकिस्तानच्या कृतीमुळे सिंधू करारातील तरतुदींवर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे भारताला नोटीस बजावणे भाग पडले आहे. सिंधू जल कराराचे उल्लंघन सुधारण्यासाठी पाकिस्तानला 90 दिवसांच्या आत आंतर-सरकारी वाटाघाटी करण्याची संधी देणे हा या नोटिशीचा उद्देश आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पाकिस्तानसोबतच्या सिंधू पाणी करारावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भारताने 25 जानेवारीला पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. याबाबत अजून पाकिस्तान किंवा जागतिक बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कराराचे भौतिक उल्लंघन सुधारण्यासाठी पाकिस्तानला वाटाघाटी करण्याची संधी देण्यासाठी ही नोटीस जारी केली आहे. वाटाघाटीसाठी पाकिस्तानला योग्य तारीख सूचित करण्याचे आवाहन केले आहे.
We've issued notice on Jan 25 for modification of Indus Water Treaty of 1960 to Pakistan. It was issued to provide opportunity to Pakistan to enter into govt-to-govt negotiation to rectify ongoing material breach of treaty. We've called upon Pak to notify suitable date:MEA Spox pic.twitter.com/MWpTpKKrY6
— ANI (@ANI) February 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 02, 2023 06:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

