
भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील केंद्रावर (Central Government) टीका करताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी सांगितले की, देशात 'मुक्त आणि न्याय्य' काहीही शिल्लक राहिलेले नाही. दिल्लीच्या राजकारणात स्वतःला देव म्हणवणारे दररोज युक्ती खेळत आहेत. राजकीय विरोधकांचा अपमान करत आहेत असा आरोप राऊतांनी केला आहे. देशात 'फ्री अँड फेअर असे काही नाही. जया बच्चन (Jaya Bachhan) यांनी रागाच्या भरात राज्यसभेत उभ्या राहून सत्ताधारी पक्षाला शिव्या दिल्या. ही चर्चा अजूनही सुरू आहे, असे राऊत यांनी सामनामधील त्यांच्या साप्ताहिक स्तंभात सांगितले. सेनेचे खासदार पुढे म्हणाले की, संसदीय अधिवेशने आणि परंपरा पायदळी तुडवली जात आहेत.
लोकशाहीत नेहमी विरोधकांच्या वागण्याकडे बोट दाखवले जाते. पण सत्ताधाऱ्यांचे वर्तन कितीही बेकायदेशीर असले तरी त्यांच्याकडे कोणी बोट दाखवत नाही, असेही ते म्हणाले. संसद आणि राज्याच्या विधिमंडळात कुत्रे-माकडांचा जुना खेळ सुरू असल्याचे सांगून राऊत म्हणाले की, केंद्र विरोधकांना कुत्र्यासारखी वागणूक देत आहे. जुन्या मातोश्री निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत एक फलक होता. हेही वाचा BJP आमदार Nitesh Rane यांच्या निलंबनाची मागणी; मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जाताना दिल्या होत्या 'म्याव, म्याव' घोषणा
त्यात लिहिले होते, मी लोकप्रतिनिधींना जितके जास्त पाहतो, तितकेच मी माझ्या कुत्र्यांचे कौतुक करतो. हे वाचून बाळासाहेब ठाकरे म्हणत, असं बोलून तुम्ही कुत्र्यांचा अपमान करताय. ते पुरुषांपेक्षा अधिक निष्ठावान आहेत. आज दिल्लीच्या राजकारणात स्वतःला देव म्हणवणारे आहेत. ते विरोधकांना कुत्र्यासारखे वागवत आहेत, असे राऊत म्हणाले.