Mumbai Sea Link: नरिमन पॉइंट ते कुलाबा कफ परेड पर्यंतचा प्रवास होणार सोपा! 1.6 किलोमीटर लांबीचा पूल बांधण्याची प्रक्रिया सुरू
Nariman Point (PC - Wikimedia Commons)

Mumbai Sea Link: येत्या दोन वर्षांत नरिमन पॉइंट (Nariman Point) ते कुलाबा कफ परेड हा प्रवास अतिशय सोपा होणार आहे. कारण, दक्षिण मुंबई (Mumbai) च्या या भागात 1.6 किलोमीटर लांबीचा पूल बांधण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या संदर्भात, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा हा अद्भुत ड्रीम प्रोजेक्ट सन 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी निविदा जारी केली आहे. पुढील 2 वर्षात या पुलाचे काम पूर्ण होणार आहे.

विशेष म्हणजे नरिमन पॉइंटपासून कफ परेडचे अंतर कमी करण्यासाठी समुद्रावरील 1.6 किमी लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. समुद्रातून जाणाऱ्या या पुलावर एकूण 4 लेन असतील. यामध्ये नरिमन पॉइंटच्या 2 लेन आणि कुलाब्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी 2 लेन करण्यात येणार आहेत. या पुलाच्या उभारणीसाठी सुमारे 284 कोटी रुपये खर्च येणार आहे. (वाचा - Mumbai: काल राँग साईड ड्रायव्हिंगच्या 85 केसेस, तर 'ऑपरेशन खटारा' अंतर्गत 126 गाड्या काढल्या- Sanjay Pandey)

या पुलाच्या उभारणीमुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर वांद्रे-वरळी सी लिंकवरून येणारी वाहने वरळीजवळ बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलावरून अवघ्या काही मिनिटांत कुलाब्याला पोहोचतील. सध्या लोकांना हे अंतर कापण्यासाठी 20 ते 30 मिनिटे लागतात.

मे महिन्यापासून होणार बांधकाम सुरू -

मुंबईच्या समुद्रावर बांधल्या जाणार्‍या या तिसर्‍या पुलाचे बांधकाम येत्या मे महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने कंत्राटदार कंपनीची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर कंत्राटदाराची निवडही 7 एप्रिलपर्यंत केली जाणार आहे. पुलाच्या बांधकामासोबतच 10 वर्षे पुलाच्या दुरुस्तीची आवश्यक जबाबदारीही ठेकेदार कंपनीला घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, 2022-23 च्या बजेटमध्ये MMRDA ने पुलाच्या बांधकामासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचवेळी 2010 सालीच वांद्रे ते वरळी दरम्यान 5.6 कि.मी. लांबलचक लिंक तयार होती. सध्या वांद्रे ते वर्सोवा हे अंतर 17.7 किमी आहे. सी लिंकच्या उभारणीचे काम सध्या जोरात सुरू आहे.