Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवली 'ही' अट
राज्यात सोमवारी विधानपरिषद निवडणूक पार पडली. त्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षावर बराच काळ नाराज होते आणि सोमवारी विधानपरिषदेत मतदान केल्यानंतर ते आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातमधील सुरतला रवाना झाले.
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेवर नाराज झाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती क्षणोक्षणी बदलत आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसोबत गुजरातमधील सुरत येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्यासोबत 21 आमदार आहेत. या आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासमोर एक अट ठेवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती तोडल्यास आम्ही शिवसेनेतच राहू, अशी अट ठेवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी या आमदारांची इच्छा आहे.
राज्यात सोमवारी विधानपरिषद निवडणूक पार पडली. त्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षावर बराच काळ नाराज होते आणि सोमवारी विधानपरिषदेत मतदान केल्यानंतर ते आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातमधील सुरतला रवाना झाले. त्यामुळे सत्तेतील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. (हेही वाचा -Shiv Sena Action On Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना संघर्षाची चिन्हे, पक्षाने विधिमंडळ गटनेता पदावरुन हटवताच ट्विटद्वारे प्रत्युत्तर)
दरम्यान, या वृत्तानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी मवाचे मित्रपक्ष बैठक घेऊन विचार करत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे अनेक नेते नाराज एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेवर हे संकट अचानक निर्माण झाले नसून एकनाथ शिंदे यांची नाराजी अनेक दिवसांपासून बाहेर येत होती, ज्याकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुर्लक्ष करत होते.
दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या वक्तृत्वावर एकनाथ शिंदे यांचा आक्षेप होता. संजय राऊत शरद पवारांच्या जवळ गेल्याने शिवसेनेचे नुकसान झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिली होती. यामुळे अनेक शिवसैनिक संतप्त झाले होते. असे असतानाही त्यावर कोणतेही पावले उचलली गेली नाहीत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2022 04:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

