Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिघडलेल्या 'कायदा आणि सुव्यवस्थे'वरून विरोधकांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा

बाबा सिद्दीकीच्या निर्घृण हत्येवरून राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलताना शरद पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सत्तेत असलेल्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिघडलेल्या 'कायदा आणि सुव्यवस्थे'वरून विरोधकांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा
Mallikarjun Kharge, Baba Siddiqui, Sharad Pawar (फोटो सौजन्य - एक्स)

Baba Siddiqui Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येनंतर बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी महायुती आघाडीवर निशाणा साधला आहे. शनिवारी सायंकाळी मुंबईतील वांद्रे पूर्व भागात अज्ञात हल्लेखोरांनी अनेक गोळ्या झाडून सिद्दीक यांची निर्घृणपणे हत्या केली. काँग्रेसचे माजी सहकारी सिद्दीकी यांच्या निधनाचा निषेध व्यक्त करताना पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे दुःखद निधन हे शब्दांपलीकडे धक्कादायक आहे. या दु:खाच्या प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या समर्थकांना न्याय मिळाला पाहिजे आणि सध्याच्या महाराष्ट्र सरकारने सखोल आणि पारदर्शक तपासाचे आदेश दिले पाहिजेत. दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. जबाबदारी सर्वात महत्त्वाची आहे. (हेही वाचा -Baba Siddique Passes Away: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू)

दरम्यान, बाबा सिद्दीकीच्या निर्घृण हत्येवरून राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलताना शरद पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सत्तेत असलेल्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था ही चिंतेची बाब आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबाराची घटना खेदजनक आहे. गृहमंत्री आणि राज्यकर्ते सौम्यपणे राज्याचा कारभार सांभाळणार असतील तर? हे सामान्य लोकांसाठी धोक्याची घंटा असू शकते,' असं शदर पवार यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींवर कसा झाला गोळीबार, वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं? या गँगवर होत आहे आरोप)

याशिवाय, शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील प्रशासन पूर्णपणे कोलमडण्यावर भर दिला. त्यांनी म्हटलं आहे की, बाबा सिद्दीकी जी यांची हत्या धक्कादायक आहे. आम्ही त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रतिबिंबित करते. प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2024 09:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).