Stop Construction Works At Night: आता रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बांधकामे राहणार बंद, पोलीस आयुक्त संजय पांडेचा आदेश
building in Mumbai (Photo Credits: ANI)

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी नवा आदेश दिला आहे. यापुढे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बांधकामे (Construction) होणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील खूप तक्रारी येत होत्या. ध्वनिप्रदूषणाकडे (Noise pollution) गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे तक्रारींमध्ये बोलले जात होते. हे प्रदूषण दिसत नसले तरी ते प्राणघातक आहे. यामुळे लहान मुले व वृद्धांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ध्वनी प्रदूषणात थोडी वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी होणारी बांधकामे हे त्याचे प्रमुख कारण आहे. या तक्रारी लक्षात घेऊन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रात्री  10 ते सकाळी 6 या वेळेत मुंबईत कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांना त्रास होत असल्याचे पोलिस आयुक्तांच्या लक्षात आले. त्यामुळे या तक्रारीकडे लक्ष देण्याची गरज आहे. यानंतर संजय पांडे यांनी बांधकामाशी संबंधित व्यावसायिकांची बैठक घेतली. बैठकीनंतर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणतेही बांधकाम केले जाणार नाही, असे आदेश त्यांनी दिले. रात्री मुंबईतील बांधकामे बंद ठेवण्याची माहिती उद्योजक आणि व्यावसायिकांना देण्यात आली आहे. हेही वाचा Maharashtra Budget 2022: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा शेतकरी, दलितांच्या विरोधात; सर्वसामान्यांना काहीही मिळालेले नाही; Devendra Fadnavis यांची टीका (Watch)

यासोबतच बांधकामाच्या ठिकाणी हा आवाज दूरवर पसरू नये यासाठी व्यवस्था करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे. आवाज दूरवर ऐकू येऊ नयेत म्हणून अशा तंत्राचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विहित डेसिबल मर्यादेपेक्षा आवाज येणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. आवाजाची पातळी 65 डेसिबलपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त झाल्यानंतर संजय पांडे सातत्याने सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियात येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींकडे ते लक्ष देत आहेत. फेसबुक लाईव्हमध्ये अनेकांनी त्याच्याकडे ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी केल्या. यानंतर संजय पांडे यांनी मुंबईतील काही बडे बिल्डर आणि व्यावसायिकांची बैठक घेऊन हा आदेश दिला.