थंडीमुळे मुंबईकर गारठले, तापमानाचा पार 24 अंश सेल्सियसपेक्षा खाली उतरला
उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांनी पुन्हा जोर धरला असल्याने त्याचा परिणाम विविध राज्यांमध्ये होत आहे. त्यात मुंबईत शुक्रवारी (8 फेब्रुवारी) पारा 24 अंश सेल्सियसच्या खाली गेल्याने मुंबईकर चांगलेच कुडकुडले आहेत.
Mumbai: उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांनी पुन्हा जोर धरला असल्याने त्याचा परिणाम विविध राज्यांमध्ये होत आहे. त्यात मुंबईत शुक्रवारी (8 फेब्रुवारी) पारा 24 अंश सेल्सियसच्या खाली गेल्याने मुंबईकर चांगलेच कुडकुडले आहेत. तर गेल्या दक्षकातील मुंबईत सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच कमाल 7 अंश सेल्सियसने पारा खाली उतरला आहे.
गेल्या आठवड्यात शहरातील तापमान 35 अंश सेल्सियस एवढे झाले होते. त्यामुळे थंडी जाऊन उन्हाळा सुरु होईल असे वाटत होते. मात्र कालपासून उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याने जोर धरल्याने मुंबईसह इतर राज्यात थंडीमुळे तापमान खाली गेले आहे. (हेही वाचा-राज्यात पुढील दोन दिवस हुडहुडी कायम राहणार)
Right now: Haze, Temperature: 18.2C, Humidity: 45%, Wind: From West at 9.3KPH, Updated: 6:35AM #Mumbai #Weather
— WeatherMumbai (@WeatherMumbai) February 9, 2019
Day temperature at 24°C and minimum temperature at 11°C in Santacruz!
Colaba's minimum around 15.6°C!@IndianWeather_ @KachwalaAbizer#mumbaiweather #Mumbai pic.twitter.com/hbKXEIOvx6
— Clerean Pereira (@clerean_pereira) February 9, 2019
तर थंडीतील मुंबईचे तापमान गेल्या दहा वर्षात फेब्रुवारी महिन्यात 26 अंश सेल्सियसने खाली आले होते. तर यंदा तापमान 24 अंशापेक्षा खाली उतरले आहे. त्यामुळे सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरणात गारठा दिसून आला. तसेच मुंबईकर ही रस्त्यांवरुन जाताना स्वेटर, शाल किंवा कानटोपी घातलेले पाहायला मिळाले.
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2019 09:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

