
मुंबईमधील (Mumbai) दहिसर ते भाईंदर या मेट्रो-9च्या (Metro-9) रेल्वे मार्गासाठी कारशेड बांधण्याच्या सुरुवातीच्या डेकला अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी देण्यात आली आहे. या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) भाईंदरजवळील उत्तनच्या डोंगरी (सर्व्हे क्रमांक 19) येथील 59-हेक्टर (145 एकरपेक्षा जास्त) सरकारी जमिनीचा आगाऊ ताबा देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी 8 ऑगस्ट रोजी जारी केला आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट) नियम, 1971 अंतर्गत तयार केलेल्या तरतुदींचे पालन करत, महसूल विभागाने सरकारी मालकीची जमीन हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
पुढील महिन्यात यासाठीची अंतिम प्रक्रिया पूर्ण केली जाईल व त्यानंतर कारशेड बांधण्यासाठी निविदा काढल्या जातील. कारशेड डोंगरी येथे स्थलांतरित केल्याने बाधित शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी भाईंदरजवळील राय गावात खाजगी जमिनीवर हे कारशेड बांधण्यात येणार होते व त्यासाठी आधीच्या संरेखनाच्या मार्गात सुमारे 428 बांधकामे पाडण्यात आली. (हेही वाचा: Mumbai Local Update: मुंबईकरांना दिलासा; उद्यापासून CSMT वरून पहाटे 4.35 वाजता सुटणार पहिली फास्ट लोकल)
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नागपुरातील राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात, राय गावात कारशेड बांधल्याने शेतकरी समुदाय आणि ज्यांची जुनी घरे आणि शेतजमिनींचे नुकसान होऊन उदरनिर्वाहाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, अशा गावकऱ्यांच्या दुरवस्थेबद्दल स्पष्टीकरण देताना हा मुद्दा उपस्थित केला होता. मेट्रो 7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) चा विस्तार, मेट्रो 9 हा 13.581 किमीचा मार्ग असून 11.389 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. भाईंदर ते उत्तनपर्यंतच्या पुढील विस्तारामुळे राज्याच्या तिजोरीवर 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा भार पडणार आहे.