Maharashtra: महाराष्ट्रातील माथाडी कामगार उद्या संपावर जाण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या पाटील यांनी 1 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे आणि ठाणे येथील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC) संप पुकारला आहे.

Maharashtra: महाराष्ट्रातील माथाडी कामगार उद्या संपावर जाण्याची शक्यता
प्रतिकात्मक फोटो| (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील सुमारे 40,000 माथाडी किंवा हेडलोड कामगार (Mathadi Workers) त्यांचे नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्या आवाहनानंतर सरकारच्या निषेधार्थ बुधवारी संपावर जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या पाटील यांनी 1 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे आणि ठाणे येथील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC) संप पुकारला आहे.  राज्यभरातील एपीएमसी बाजारपेठा बंद पडण्याची शक्यता असल्याने बुधवारी भाजीपाला आणि फळांची पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे वारंवार सांगितले जात आहे.

जनतेप्रमाणेच नेत्यांच्याही सरकारकडून अपेक्षा आहेत, मात्र आमची निराशा झाली आहे, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी भेटीगाठी आणि निवेदने देऊनही समस्या सोडवण्यासाठी भेटीसाठी वेळ दिलेला नाही. शिंदे-फडणवीस सरकार माथाडींच्या प्रश्नाबाबत संवेदनशील नसल्याचं दिसतंय, त्यामुळे 1 फेब्रुवारीला माथाडी कामगारांचा राज्यव्यापी संप होणार आहे, पाटील पुढे म्हणाले. महाराष्ट्रात 36 माथाडी मंडळे असून त्यापैकी 11 मुंबई , ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आहेत. हेही वाचा Anganewadi Bharadi Devi Yatra 2023 Special Trains: आंगणेवाडीच्या यात्रेसाठी जाणार्‍या भाविकांकरिता विशेष ट्रेन्स धावणार; इथे पहा वेळापत्रक

धोरणे ठरवून सोडवता येतील अशा अनेक प्रश्नांची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि संबंधित विभागाचे प्रधान सचिव, कामगार आयुक्त, माथाडी मंडळ आदींना निवेदने देण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. संयुक्त बैठकाही झाल्या, मात्र प्रश्न सुटले नसून त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे कामगारांनी सांगितले. किमान आता तरी सरकारने या प्रश्नांवर चर्चा करून संवेदनशीलता दाखवावी, अन्यथा माथाडी कामगारांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला.

(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2023 01:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).