महाराष्ट्र राज्य सरकारकडून कांदा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपयांचे अनुदान जाहीर
सरकारकडून कांदा उत्पादकांसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहे.
150 Cr as a Relief to Onion Farmers in Maharashtra :राज्यातील कांदा उत्पादकांना महाराष्ट्र सरकारने एक दिलासादायक बातमी दिली आहे. सरकारकडून कांदा उत्पादकांसाठी (Onion Farmers) 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहे. कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळत असल्याने देशभरातील शेतकरी पेटला आहे. काही दिवसांपूर्वी याच रागाच्या भरामध्ये संजय साठे नावाच्या एका शेतकर्याने पंतप्रधान कार्यालयामध्ये कांदा विक्रीमधून मिळालेले 1064 रूपये मनिऑर्डरच्या स्वरूपात पाठवले होते. पंतप्रधान मोदींना मनीऑर्डर: संजय साठे यांची PMOकार्यालयाकडून दखल
Principal Secy of Maharashtra's Marketing Dept: Cabinet approves Rs 150 Cr as a relief to onion farmers who had to sell their produce at low prices. An ex-gratia payment at rate of Rs 200/quintal for onion sold b/w Nov 1 to Dec 15. It'll be applied to total 75 Lakh MT quantity.
— ANI (@ANI) December 20, 2018
कांदा उत्पादकांचा हा संताप पाहता राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 150 कोटी रूपयांची तरतूद केल्याची घोषणा केली आहे. कमी किंमतीमध्ये कांदा विकावा लागलेल्या शेतकऱ्यांना 200 रुपये प्रति क्विंटल इतके अनुदान दिले जाणार आहे. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे अनुदान 75 लाख टन कांद्यासाठी असेल. 18 नोव्हेंबरपर्यंतच्या 41. 23 लाख टन आणि 25 डिसेंबर पर्यंतच्या 33. 73 लाख टन कांद्याचा यामध्ये समावेश आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2018 02:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

