Samruddhi Expressway: समृद्धी द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल; दर 5 किलोमीटरवर बसवल्या जाणार Rumble Strips

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड (MSRDC) च्या अधिकाऱ्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी द्रुतगती मार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 3,500 अपघातांची नोंद झाली आहे.

Samruddhi Expressway: समृद्धी द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल; दर 5 किलोमीटरवर बसवल्या जाणार Rumble Strips
Pic Credit: samruddhi mahamarg Wikimedia Commons

Samruddhi Expressway: नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गावर ( Nagpur-Mumbai Samruddhi Expressway) नुकत्याच झालेल्या अपघातांनंतर, राज्य सरकारच्या प्राधिकरणाने कार्यान्वित मार्गावर दर 5 किमीवर रंबल पट्ट्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय वाहनचालकांना सतर्क राहण्यासाठी कॅरेजवेवर शिल्पे उभारली जातील, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड (MSRDC) च्या अधिकाऱ्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी द्रुतगती मार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 3,500 अपघातांची नोंद झाली आहे.

तथापी, समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून सप्टेंबरपर्यंत सुमारे 49 लाख वाहनांनी त्यावरून प्रवास केला. अलीकडे या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक 5 किमी अंतरावर रंबल पट्ट्या बसवल्या जातील. सध्या, पट्ट्या सुमारे 10 किमी अंतरावर आहेत. आम्ही नियमित अंतराने वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसविण्याची योजना आखत आहोत, असेही अधिकाऱ्याने यावेळी नमूद केलं. (हेही वाचा - Vande Sadharan Express: 'वंदे साधरण एक्स्प्रेस' मुंबईत दाखल; माझगाव येथील वाडीबंदर रेल्वे यार्डात घेण्यात येणार ट्रायल)

यावर्षी नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गावरील (समृद्धी महामार्ग) अपघात कमी करण्यासाठी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी विविध सुरक्षेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. रस्ता संमोहन टाळण्यासाठी मध्यभागी रंगीबेरंगी ध्वज स्थापित केले गेले. MSRDC ने सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी टोल प्लाझावर सावधगिरीचे संकेत, परावर्तित टेप, सोलर ब्लिंकर आणि सार्वजनिक घोषणा प्रणाली देखील समाविष्ट केल्या आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी 11 डिसेंबर ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत महामार्गावर 860 अपघात झाले आहेत. अंदाजे 44% मृत्यू हे चाक खराब झाल्याने झाले आहेत. ड्रायव्हरचा थकवा, टायर फुटणे आणि यांत्रिक बिघाड ही या वर्षी डिसेंबर ते मार्च दरम्यान झालेल्या 400 हून अधिक अपघातांची कारण आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2023 02:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).