Maharashtra Politics: भाजप फक्त पैसा आणि ईडीच्या जोरावर जिंकला, सुप्रिया सुळेंचे वक्तव्य
NCP MP Supriya Sule | (Photo courtesy: facebook / supriyasule)

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्याकडून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर घोडे-व्यापारचा आरोप केला.  दुसरीकडे भाजपने अधिकारांचा गैरवापर करून विजय मिळवल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्याच वेळी, काँग्रेसचे म्हणणे आहे की जर त्यांच्या आमदारांनी हंडोरे यांना मतदान केले नाही, तर ते यासाठी कोणाला दोष देऊ शकत नाहीत. काँग्रेसच्या दोन उमेदवारांपैकी भाई जगताप विजयी झाले आहेत. पण हंडोरे यांना भाजपचे उमेदवार लाड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला, हा राज्यातील सत्ताधारी एमव्हीए सरकारसाठी मोठा धक्का आहे.

निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले, तर शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवारही विजयी झाले. शिवसेनेचे दोन विजयी उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना प्रत्येकी 26 मते मिळाली, तर पक्षाकडे एकूण 55 मते होती. अहीर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पक्षाचे वरिष्ठ त्याचे विश्लेषण करतील.  त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या निकालावरून सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासोबत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काय केले जात आहे तेही तुम्हाला माहीत आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत म्हणाले की, भाजपने अधिकाराचा गैरवापर केल्यामुळेच भाजपच्या  उमेदवाराला विजय मिळाला. राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना 51 विरुद्ध 57 मते मिळाली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले की, या विजयामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील आमदारांची एकजूट दिसून येते. हेही वाचा  Maha Vikas Aghadi: महाविकासआघाडीतील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेसमध्ये अनागोंदी, शिवसेनेचा मंत्री नॉट रिचेबल

काँग्रेसच्या पराभवाबाबत विचारले असता पाटील म्हणाले, उद्या कळेल. ज्यांनी घोडे-व्यापार केले असतील, ते हळूहळू समोर येतील. भाजपवर निशाणा साधत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पक्ष फक्त पैसा आणि ईडीच्या जोरावर जिंकला आहे. काँग्रेस उमेदवाराच्या पराभवावर पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, त्यांच्या उमेदवाराला पक्षाच्या आमदारांनी मतदान केले नाही हे नाकारता येणार नाही.