
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Quotes in Marathi: मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून एका महाकाय साम्राज्याचा पाया घातला, जो नंतर मुघल आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींना आव्हान देणारा ठरला. लहानपणापासूनच, शिवाजी महाराजांना त्यांच्या मातृभूमीला परकीय राजवटीपासून मुक्त करण्याचे ध्येय होते. त्यांच्या लष्करी मोहिमा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुरू झाल्या, परंतु कालांतराने त्या दख्खनच्या पठारापर्यंत पसरल्या आणि अखेर भारताच्या किनारी आणि दक्षिणेकडील प्रदेशांपर्यंत पोहोचल्या.
महाराष्ट्रातील आपला गड सुरक्षित केल्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडील प्रदेशात प्रवेश केला. कर्नाटक आणि तामिळनाडूमधील त्यांच्या मोहिमांमुळे मराठ्यांचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढला. 12 एप्रिल रोजी शिवाजी महाराजांची तिथीनुसार, येणारी पुण्यतिथी (Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi) साजरी करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Messages द्वारे तुम्ही छत्रपतींच्या स्मृतीस वंदन करू शकता. यासाठी तुम्ही खालील कोट्स, ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..
छत्रपती शिवाजी महाराज यांना
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस
सिहांसनाधीश्वर.. योगीराज.. श्रीमंत...
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...
छत्रपती शिवाजी महाराज यांना
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

निधड्या छातीचा, दणकट कणांचा
मराठी मनांचा, भारत भूमीचा
एकच राजा शिवाजी महाराज
यांना त्रिवार मानाचा मुजरा...
छत्रपती शिवाजी महाराज यांना
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

श्वासात रोखुनी वादळ
डोळ्यात रोखली आग
देव आमचा छत्रपती
एकटा मराठी वाघ….
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...
छत्रपती शिवाजी महाराज यांना
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

रणांगण दणाणलं, सिंह गर्जला,
मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं!
पराक्रमाची गाथा लिहून गेला जो,
तो एकच राजा छत्रपती शिवराय!
छत्रपती शिवाजी महाराज यांना
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिवाजी महाराजांच्या दक्षिणेकडील विस्तारामुळे मराठा साम्राज्य केवळ बळकट झाले नाही तर मुघल आणि युरोपीय प्रभावांना तोंड देण्यास सक्षम असलेली एक प्रमुख शक्ती म्हणूनही त्याला स्थान मिळाले. शिवरायांना पहिले लष्करी यश तोरणा किल्ला ताब्यात घेऊन आले, ज्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात झाली.