गुरुवारी संध्याकाळी नियमित पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे (Ministry of Health) सहसचिव लव्ह अग्रवाल (Lav Agrawal) यांनी देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) परिस्थितीबद्दल माहिती दिली. देशात 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 941 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे व एका दिवसात 183 लोकांची प्रकृती बरी झाली आहे. यासह आता देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 12,759 वर गेली आहे. अशाप्रकारे आरोग्य, गृह मंत्रालय आणि आयसीएमआर दररोज पत्रकार परिषद घेऊन कोरोनाबाबत अपडेट्स देत असतात. यासह एएनआयने दिलेल्या माहितीनुसार परदेशातील 3036 भारतीय लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.
India's total number of #Coronavirus positive cases rises to 12,759 (including 10,824 active cases, 1514 cured/discharged/migrated and 420 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/cAI2YMIxGP
— ANI (@ANI) April 16, 2020
भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे गेल्या 24 तासांत 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 420 लोकांचा मृत्यू झाला आहे. परदेशातील भारतीयांबद्दल बोलायचे तर, एकूण 53 देशातील 3036 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या विषाणूमुळे परदेशात एकूण 25 भारतीयांचा मृत्य0%E0%A4%B2+%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82+%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+12%2C759+%E0%A4%B5%E0%A4%B0%2C+%E0%A4%A4%E0%A4%B0+53+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2+3036+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE+%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3 https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Findia%2Fnews%2Fthe-number-of-corona-virus-outbreaks-in-india-at-12759-3036-indians-infected-with-corona-virus-in-53-countries-121616.html',900, 600)">