Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या 13 जागांसाठी 31 मार्च रोजी मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा
राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) 13 जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणुकीची घोषणा केली आहे. या 13 जागांसाठी येत्या 31 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या 13 जागा प्रामुख्याने 6 राज्यांतून भरल्या जाणार आहेत.
राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) 13 जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणुकीची घोषणा केली आहे. या 13 जागांसाठी येत्या 31 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या 13 जागा प्रामुख्याने 6 राज्यांतून भरल्या जाणार आहेत. यात पंजाब येथून पाच, केरळ येतून तीन, असम दोन, हिमाचल प्रदेश, त्रिपूरा आणि नागालँड प्रत्येकी एका जागेचा समवेश आहे. या जागांवर कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनी या जागेवर उमेदवार दिले आणि ते निवडून आणले तर विरोधकांचे राज्यसभेतील बळ वाढणार आहे. मात्र, सत्ताधारी भाजपने या जागा जिंकल्या तर एनडीए सरकारची ताकद राज्यसभेत आणखी वाढली जाणार आहे.
राज्यसभेतून निवृत्त होणारे सदस्य
- आनंद शर्मा (हिमाचल प्रदेश)
- एके अँटनी, सोमा प्रसाद के आणि एम व्ही शेयम्स कुमार (केरळ)
- सुखदेव सिंह, प्रताप सिंह बाजवा, श्वेता मलिक, शमशेर सिंह दुलो, नरेश गुजराल (पंजाब) (हेही वाचा, Budget Session 2022: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; आर्थिक पाहणी अहवाल आज, उद्या अर्थसंकल्प)
दरम्यान, असम दोन, हिमाचल प्रदेश, त्रिपूरा आणि नागालँड येथून राज्यसभेचा प्रत्येकी एक सदस्य निवृत्त होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून राज्यसभेसाठी आता विद्यमान सदस्यांनाच उमेदवारी दिली जाते की, नव्या चेहऱ्यांची निवड केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2022 05:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

