मुंबईत 3 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. DRI अधिका-यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी तपास सुरु आहे.
Maharashtra: Officers of DRI Mumbai have seized heroin worth Rs 3 Crores, further investigation underway pic.twitter.com/AzwVF1VmXQ— ANI (@ANI) December 4, 2020
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून उद्या यावर अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कोविड19 नंतरच्या स्थितीतून पुन्हा एकदा शिकण्यासारखे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
The post COVID19 order will be about re-learning, re-thinking and re-innovating: Prime Minister Narendra Modi https://t.co/xtcTuTg9wv— ANI (@ANI) December 4, 2020
पंजाब येथे कोरोनाचे आणखी 4482 रुग्ण आढळले असून 20 जणांचा बळी गेला आहे.
Punjab: 20 more deaths due to #coronavirus push toll to 4,882, infection count mounts to 1,54,788 with 726 new cases; number of active cases 7,785, according to medical bulletin— Press Trust of India (@PTI_News) December 4, 2020
Maharashtra MLC Election 2020 मध्ये पुणे शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे जयंत असगावकर विजयी झाले आहेत.
Maharashtra: Maha Vikas Aghadi leader Jayant Aasgavkar wins from Pune Teachers Constituency in MLC elections— ANI (@ANI) December 4, 2020
दिल्ली सरकारकडून अनस्किल्ड, सेमी स्किल्ड, स्किल्ड आणि अन्य कॅटेगरी मधील कामगारांच्या DA मध्ये वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
Delhi govt raises monthly dearness allowance for its unskilled, semi-skilled, skilled and other category workers: Deputy CM Manish Sisodia— Press Trust of India (@PTI_News) December 4, 2020
GHMC Election Results नंतर भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करत आतिषबाजी करण्यात येत आहे.
#WATCH Telangana: BJP workers burst crackers in Hyderabad following the #GHMCElectionresults https://t.co/xihpiLV81t pic.twitter.com/JQa2eKO7kY— ANI (@ANI) December 4, 2020
मुंबईत आज दिवसभरात 1025 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 2,59,137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत आज 813 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,84,502 वर पोहोचली आहे.
#CoronavirusUpdates
४ डिसेंबर, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/HXHsZmwHy1— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 4, 2020
महाराष्ट्रात आज दिवसभरात 6776 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 17 लाख 10 हजार 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर आज नवे 5229 कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 42 हजार 587 वर पोहोचली आहे.
Maharashtra reports 5,229 new #COVID19 cases, 6,776 discharges and 127 deaths today.
Total cases 18,42,587
Total recoveries 17,10,050
Death toll 47,599
Active cases 83,859 pic.twitter.com/zbZy29t627— ANI (@ANI) December 4, 2020
मणिपूर मध्ये आज 273 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 22,445 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मणिपूर मध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 25,691 वर पोहोचली आहे.
Manipur reports 155 new #COVID19 cases and 273 recoveries today, taking total cases to 25,691 including 22,445 recoveries, 295 deaths and 2,948 active cases: State Health Department pic.twitter.com/wFTIMcvlUb— ANI (@ANI) December 4, 2020
विधानपरिषदेच्या 6 जागांवर 1 डिसेंबर दिवशी निवडणूक झाल्यानंतर आता त्याचे निकाल स्पष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान कालपासून सुरू झालेली मत मोजणी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आज पहाटेपर्यंत अनेक ठिकाणी मतमोजणीचं काम सुरू होते. दरम्यान निकालांचा कल पाहता भाजपाला हादरा बसण्याची शक्यता आहे. 4 ठिकाणी महाविकास आघाडी आणि एका जागेवर अपक्ष तर धुळे नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागी भाजपाला विजय मिळाला आहे.
भारतामध्ये कृषी कायद्याविरूद्ध शेतकरी मागील 8 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यावरून आता शेतकरी- सरकार मध्ये बोलणी सुरू झाली आहे. शिवसेनेने यावर सामना मधून टीका केली आहेत. हम करे सो कायदा चालणार नाही, शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणलं असं म्हणत शिवसेनेने केंद्रावर निशाणा साधला आहे. तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने काल घेतली आहे. मात्र, कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान ममता बॅनर्जी, अकाली दलाचे नेते लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत असे सांगितले आहे. तसेच काल जर केंद्राने कृषी कायदा रद्द केला नाही तर देशभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.