मुंबईत 3 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. DRI अधिका-यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी तपास सुरु आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून उद्या यावर अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

कोविड19 नंतरच्या स्थितीतून पुन्हा एकदा शिकण्यासारखे आहे असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 4482 रुग्ण आढळले असून 20 जणांचा बळी गेला आहे.

Maharashtra MLC Election 2020  मध्ये पुणे शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे जयंत असगावकर विजयी झाले आहेत.

दिल्ली सरकारकडून अनस्किल्ड, सेमी स्किल्ड, स्किल्ड आणि अन्य कॅटेगरी मधील कामगारांच्या DA मध्ये वाढ करण्यात येणार असल्याचा  निर्णय घेतला आहे.

GHMC Election Results नंतर भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करत आतिषबाजी करण्यात येत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 1025 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 2,59,137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत आज 813 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,84,502 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात आज दिवसभरात 6776 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 17 लाख 10 हजार 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर आज नवे 5229 कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 42 हजार 587 वर पोहोचली आहे.

मणिपूर मध्ये आज 273 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 22,445 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मणिपूर मध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 25,691 वर पोहोचली आहे.

Load More

विधानपरिषदेच्या 6 जागांवर 1 डिसेंबर दिवशी निवडणूक झाल्यानंतर आता त्याचे निकाल स्पष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान कालपासून सुरू झालेली मत मोजणी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आज पहाटेपर्यंत अनेक ठिकाणी मतमोजणीचं काम सुरू होते. दरम्यान निकालांचा कल पाहता भाजपाला हादरा बसण्याची शक्यता आहे. 4 ठिकाणी महाविकास आघाडी आणि एका जागेवर अपक्ष तर धुळे नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागी भाजपाला विजय मिळाला आहे.

भारतामध्ये कृषी कायद्याविरूद्ध शेतकरी मागील 8 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यावरून आता शेतकरी- सरकार मध्ये बोलणी सुरू झाली आहे. शिवसेनेने यावर सामना मधून टीका केली आहेत. हम करे सो कायदा चालणार नाही, शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणलं असं म्हणत शिवसेनेने केंद्रावर निशाणा साधला आहे. तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने काल घेतली आहे. मात्र, कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान ममता बॅनर्जी, अकाली दलाचे नेते लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत असे सांगितले आहे. तसेच काल जर केंद्राने कृषी कायदा रद्द केला नाही तर देशभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.