कुवैतहून 184 भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे गोएअर फ्लाइट आज सकाळी चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 1 जुलै 2020 पासून एका वर्षासाठी के. वेणुगोपाल यांना अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया (AGI) म्हणून पुन्हा नियुक्तीस मान्यता दिली आहे.

पुणे शहरात आज नव्याने 617 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यात नायडू-महापालिका रुग्णालये 365, खासगी 234 आणि ससूनमधील 18 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या 617 रुग्णांसह पुणे शहरातील संक्रमितांची एकूण संख्या आता 16,742 इतकी झाली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

कंटेनमेंट झोनबाहेरील केंद्र व राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्थांना 15 जुलैपासून काम करण्याची परवानगी दिली जाईल. ज्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) कार्मिक व प्रशिक्षण विभाग जारी केली जाईल. एएनआयचे ट्विट- 

 

भारत सरकारकडून अनलॉक 2 लागू होण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाही करण्यात आले आहे. दरम्यान, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो रेल, सिनेमे, जिम, तलाव, धार्मिक कार्यक्रम 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहे. एएनआयचे ट्विट- 

 

मुंबई दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत आज 1 हजार 247 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महानगरपालिकेचे ट्विट- 

  

दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दिल्लीत आज 2084 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 57 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

केंद्र सरकारकडून 59 चायनीज अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. यात Tik Tok, UC Browser अॅपचादेखील समावेश आहे.

 

महाराष्ट्रात आज 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू तर 5257 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

Load More

कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन धोरणाचे 30 जून नंतर काय होणार? याबाबत संबंध महाराष्ट्र आणि देशालाही उत्सुकता होती. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधीत केले आणि पुढे काय? या प्रश्नाचे बऱ्यापैकी उत्तर राज्यातील जनतेला मिळाले. असे असले तरी राज्य सरकारची निर्बंधांबाबतची अनिश्चितता कायम असल्याने कोणत्या भागातील दुकाने/व्यवहार सुरु असणार आणि कोणत्या भागांतील दुकाने / व्यवहार बंद असणार याबाबतचा संभ्रम कायम आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 30 जूनपासून लॉकडाऊन संपेल आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरु होतील असे वाटत असेल तर ते तसे नाही. त्या भ्रमात कोणी राहू नका. राज्यातील 80 टक्के जनतेस कोरोना लक्षणं नाहीत परंतू त्यांना संसर्ग नाही असे म्हणता येणार नाही. त्यामुळे धोका अद्यापही टळला नाही. लॉकडाऊन संपला नाही परंतू, कार्यालयं, दुकानं व्यवहार सुरु करण्यास बऱ्याच अंशी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

दुसऱ्या बाजूला देशात कोरोना व्हायरस संकट असतानाच चीनने लद्दाख आणि इतर परिसरात काढलेल्या कुरापतींमुळे नवेच दुखणे भारतासमोर उभे ठाकरे आहे. दरम्यान, लद्दाखमध्ये ज्यांनी भारताच्या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहिले त्यांना भारताने सडेतोड प्रत्युततर दिले आहे. भारत हे नेहमीच मैत्रीचा सन्मान करणारे राष्ट्र आहे. मात्र जर कोणी शत्रूत्व लादण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तरही देतो.

दरम्यान, चीन मुद्द्यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे सरकार विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना व्हायरस, लॉकडाऊन अपडेट्स, चीन मुद्दा, वाढते इंधन दर यांसह स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडमोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.