केरळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूकीत 74,899 उमेदवार निवडणूक लढवणार अशी निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे.

मणिपूर येथे संध्याकाळी 6 ते पहाटे 4 वाजेपर्यंत Night Curfew येत्या 31 डिसेंबर पर्यंत  लागू असणार आहे.

मास्क न घालणाऱ्या नागरिकांसाठी कर्नाटक सरकारची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, महापालिका क्षेत्रात 250 तर, इतर शहरातील नागरिकांकडून 100 दंड आकारला जाणार आहे. ट्विट-

 

मिझोराम मधील सर्व शाळा वर्षाच्या शेवटपर्यंत बंद राहतील, अशी माहिती समोर आली आहे. ट्विट-

 

इराणचे अव्वल अणु वैज्ञानिक Mohsen Fakhrizadeh यांची तेहरानजवळ हत्या झाली आहे, अशी माहिती इराणच्या प्रेस टीव्हीने दिली आहे. ट्विट-

 

परभणी जिल्ह्यात आज दिवसभरात आज नवे 9 कोरोनाचे रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 7052 इतकी झाली आहे.

मुंबईत मागील 24 तासांत 313 रुग्ण आढळले असून 17 रुग्ण दगावले आहेत. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,80,811 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 10,756 वर पोहोचली आहे. सद्य घडीला मुंबईत 12,588 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात आज दिवसभरात 6185 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 85 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 18 लाख 08 हजार 550 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 46,898 वर पोहोचली आहे. राज्यात सद्य घडीला 87,969 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

न्यायाधीश वा न्यायालयाविषयी असभ्य वक्तव्यांमुळे अवमान होतो मात्र जेव्हा कोणी महाराष्ट्र वा मुंबईबद्दल अशा प्रकारचे भाष्य करते तो अवमान नाही का असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

रेल्वे भवनात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने 1 व 2 डिसेंबरला सॅनिटायजिंगकरिता बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे.

Load More

राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार काही महिन्यांतच पडणार अशी टीका विरोधकांकडून वारंवार होत होती. मात्र ठाकरे सरकारची आज वर्षपूर्ती झाली आहे. गेल्या वर्षी नाट्यमय घडामोडींनंतर ठाकरे सरकार सत्तेत आले. दरम्यान, वर्षपूर्तीनंतरही विरोधकांच्या टीका थांबवलेल्या नाहीत. पुढीत 3 महिन्यात महाविकास आघाडी सरकार पडून भाजप सत्तेत येणार, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

गुजरात मधील राजकोट येथे कोविड रुग्णालयाला आग लागली असून त्यात 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर इतर रुग्णांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अद्याप सुरु आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट टाळण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज झाले आहे. लॉकडाऊनचा विचार अद्याप नसला तरी निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळेच कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.