अंदमान आणि निकोबार येथे आज आणखी 9 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. ज्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 221 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट-
9 new #COVID19 positive cases have been reported in Andaman and Nicobar today, taking the total number of cases to 221 which 58 active cases and 163 discharged cases: Andaman and Nicobar Islands Administration— ANI (@ANI) July 22, 2020
बिहारमधील 10 जिल्ह्यांतील 4.6 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
4.6 lakh people in 10 Bihar districts have been affected by #flood: Disaster management department— Press Trust of India (@PTI_News) July 22, 2020
पुणे शहरात आज नव्याने 1,751 कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या 42,466 झाली आहे. तर 883 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 16,269 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 2,23,039 झाली असून आज 7,595 टेस्ट घेण्यात आल्या.
पुणे कोरोना अपडेट : बुधवार, २२ जुलै,२०२०
शहरात नव्याने १,७५१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ४२४६६ झाली आहे. तर ८८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १६,२६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता २,२३,०३९ झाली असून आज ७,५९५ टेस्ट घेण्यात आल्या pic.twitter.com/a8LaUoZCDA— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 22, 2020
मुंबई येथील टिळक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शंकर शिबे यांचा कोरोनाव्हायरसशी लढताना मृत्यू झाला आहे. ट्विट-
मुंबई येथील टिळक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शंकर शिबे यांचा कोरोनाव्हायरसशी लढताना मृत्यू झाला आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होवो.
पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत.— Maharashtra Police (@DGPMaharashtra) July 22, 2020
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील जनतेला संबोधित केले आहे. एएनआयचे ट्वीट-
#WATCH live: PM Modi delivers keynote address at India Ideas Summit, via video conferencing. https://t.co/0iWLqo0wMM— ANI (@ANI) July 22, 2020
राज्यातील इयत्ता नववी आणि अकरावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधीही प्राप्त होणार असल्याचा आशावाद मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील इ.९ वी व इ.११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे तोंडी परीक्षा घेऊन यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय आज निर्गमित करण्यात आला.यामुळे अशा विद्यार्थ्यांना अजून एक संधी प्राप्त होणार आहे. pic.twitter.com/lxdQphLYq5— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 22, 2020
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान असलेल्या 'राजगृह' परिसरात तोडफेड आणि इमारतीस नुकसान पोहोचवल्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी आणखी एकास अटक केली आहे. विशाल अशोक ( Vishal Ashok) असे या व्यक्तिचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी उमेश जाधव याला 9 जुलै या दिवशीच अटक करण्यात आली आहे. राजगृह परिसरात तोडफोड आणि इमारतीस नुकसान पोहोचविल्याची घटना 7 जुलै रोजी घडली होती.
Maharashtra: Police arrested Vishal Ashok, the main accused in the incident where premises of Dr BR Ambedkar's house 'Rajgruha' in Mumbai was vandalised by unidentified persons on 7th July. Another accused Umesh Jadhav was arrested on 9th July.— ANI (@ANI) July 22, 2020
महाराष्ट्रात आज दिवसभरात 10,576 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरातील आकडेवारीसह राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या 3,37,607 इतकी झाल आहे. यात एकूण 12,556 कोरोना मृतांचाही समावेश आहे. राज्यात आज दिवसभरात 280 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Maharashtra reports highest single-day spike of 10,576 COVID-19 cases that takes tally to 3,37,607; death toll up by 280 to 12,556: Health department— Press Trust of India (@PTI_News) July 22, 2020
तामिळनाडू राज्यातील पहिली प्लाज्मा बँक चेन्नई शहरात आजपासून सुरु झाली. एआयडीएमके पक्षाचे आमदार एन सथन प्रभाकर यांनी पहिला प्लाज्मा देऊन या बँकेस सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. आता त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
Tamil Nadu's first plasma bank launched at RGGG Hospital in Chennai; ruling AIADMK legislator N Sathan Prabhakar, who recently recovered from #COVID19, becomes first donor at the facility— Press Trust of India (@PTI_News) July 22, 2020
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्य आणि आमदारांच्या घेडेबाजाराविषयी आणि सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नांबाबत आपल्याला माहिती आहे का? की तुमची दिशाभूल केली जात आहे, असे या पत्रात गहलोत यांनी म्हटले आहे.
Rajasthan CM Ashok Gehlot writes a letter to PM Narendra Modi regarding 'despicable attempts to destabilize elected governments through horse-trading'. "I don't know to what extent you are aware of all this or you are being misled," he writes in the letter. pic.twitter.com/PSJlBYbnSZ— ANI (@ANI) July 22, 2020
भारतात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, मंगळवारी महाराष्ट्रात तब्बल 8 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 27 हजार 31 इतकी झाली. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
देशातील अनेक दिग्गज कलाकार, नेतेदेखील कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. मंगळवारी औरंगाबादमधील आमदार आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता भाजप पक्षातील एका आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाशी झुंजत असलेले बिहारमधील भाजपा आमदार सुनिल कुमार सिंह यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झालं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. या भूमिपूजनाकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून राम मंदिर भूमिपूजनापूर्वी बाबरी कटाचा खटलाचं बरखास्त केला तर शहीद झालेल्यांना मानवंदना ठरेल, असं मत व्यक्त केलं आहे.