कोपरी पोलीस ठाण्यातील हवालदार राजेंद्र आनंद महाडिक यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे.

 

झारखंडमध्ये 1,702 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच  8 जणांचा मृत्यू झाल आहे.

 

पिंंपरी चिंंचवड मध्ये आज पुन्हा 997 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत यानुसार एकुण बाधितांंचा आकडा 65,379 इतका झाला आहे. आज या महापालिका भागात 1188 रुग्णांंनी कोरोनावर मात केली असुन आजवर कोरोनातुन रिकव्हर झालेल्यांंचा आकडा 54,779 इतका झाला आहे. सध्या केवळ 9,535 रुग्णांवर उपचार सुरु असुन आजवर कोरोनामुळे महापालिका क्षेत्रात 1065 मृत्यु झाले आहेत.

कांंदा  निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्राचा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र कॉंग्रेस उद्या उद्या राज्यव्यापी निषेध आंदोलन करणार अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांंनी केली आहे.

आसाम रायफल्सच्या जवानांनी आज मिझोरमच्या तोंग्सम (चांपाई) येथून साधारण 55 लाख रुपयांच्या अवैध विदेशी सिगरेट जप्त केल्या आहेत.  जप्त केलेल्या वस्तू सीमाशुल्क विभागाकडे देण्यात आल्या आहेत.

झारखंंड मधील गुमला जिल्ह्यात  एका महिलेने आपला प्रियकर व अन्य एका पुरुषाच्या मदतीने आपल्याच पतीची हत्या केल्याचे समजत आहे. याबाबत माहिती मिळताच संतप्त गावकर्‍यांंनी या तिघांंनाही ठार केले आहे.

आपल्या कपटी हेतुला पुर्ण करण्यासाठी खोटे, बनावट दावे करुन भारताची प्रतिमा खराब करणे ही पाकिस्तानची सवयच आहे अशा शब्दात जिनिव्हा कायमस्वरुपी मिशनचे भारतीय प्रथम सचिव पवन बधे यांंनी पाकिस्तानचा समाचार घेतला आहे. मानवधिकार काउंसिलच्या 45 व्या अधिवेशनात ते बोलत होते.

कोरोनामुळे पाकिस्तानात अडकलेले 363 NORI (भारतात येण्यासाठी आक्षेप नसलेले) व 37 भारतीय अटारी- वाघा बॉर्डर वरुन आज देशात परतले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार कोरोना संकट काळात वैद्यकीय कर्मचार्‍यांंसाठी देण्यात आलेला 50 लाखाचा विमा पुढील सहा महिन्यांंसाठी सलग लागु असणार आहे. आतापर्यंंत यातुन 61 जणांंना आर्थिक मदत झालेली आहे.

विजयनगर कालखंडात भारतातील मंदिरातून चोरी केलेली प्रभु राम, लक्ष्मण आणि माता सीता यांंची तीन शिल्पे ब्रिटीश पोलिसांनी लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयात  हस्तांतरित केली, या सोहळ्यास केंद्रीय मंंत्री प्रल्हाद पटेल यांंनी व्हर्च्युअली उपस्थिती लावली होती.

Load More

दिल्लीमध्ये यंदा कोरोना संकटकाळात पुरेशी खबरदारी घेत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. दरम्यान आज या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज राज्यसभा आणि लोकसभेमध्ये महत्त्वाची दुरूस्ती विधेयकं मांडली जाणार आहेत. दरम्यान हे अधिवेशन 1 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.

महाराष्ट्रामध्ये आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम सुरू केला आहे. जगाच्या कोरोनाबाधित देशांच्या यादीमध्ये भारतातील महाराष्ट्र राज्याचा समावेश व्हावा इतक्या झपाट्याने सध्या राज्यात कोरोनाचा झपाट्याने पसार होत आहे. दिवसागणिक वाढती रूग्णसंख्या पाहता आता नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने गाव पातळीपर्यंत जाऊन लोकांना कोरोना व्हायरसपासून दूर ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचं ठरवलं आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान आंतरराष्ट्रीय दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड म्हणजे आज प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारत देशाने मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल. २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा सदस्य असणार आहे.