Noida Heatwave Death Toll: उष्णतेच्या लाटेचा कहर! आणखी 18 मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले, अवघ्या 4 दिवसांत आकडा 93 वर
सध्या उत्तर भारतात भयंकर उष्णतेची लाट सुरू आहे. गौतम बुद्ध नगर आरोग्य विभागाला पोस्टमॉर्टमसाठी आणखी 18 मृतदेह मिळाले आहेत. यापूर्वी, 18 ते 20 जूनपर्यंत विभागाला शवविच्छेदनासाठी किमान 75 मृतदेह मिळाले होते.
Noida Heatwave Death Toll: गौतम बुद्ध नगर आरोग्य विभागाला 21 जून रोजी उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीत शवविच्छेदनासाठी आणखी 18 मृतदेह प्राप्त झाले. चार दिवसांत केलेल्या शवविच्छेदनांची संख्या 93 झाली, त्याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. विभागाने अनोळखी मृतदेहांचे डीएनए नमुने घेणे सुरू केले आहे, असे त्यांनी सांगितले. '21 जून रोजी पोस्टमॉर्टमसाठी आणखी 18 मृतदेह मिळाले. त्यापैकी सहा मृतदेह अज्ञात आहेत', असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कुमार शर्मा यांनी सांगितले. 'आता, मृतदेहांचे डीएनए नमुने घेणे सुरू केले आहे. ज्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा ते पोलिसांच्या स्वाधीन करू. त्यामुळे या मृतदेहांची वेळेवर विल्हेवाट लावता येईल"असे शर्मा म्हणाले.(हेही वाचा:Heatstroke Cases in India: यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताला सामेरे गेलेल्या नागरिकांचा आकडा 40 हजारांच्यावर - रिपोर्ट )
18 ते 20 जून या कालावधीत विभागाला शवविच्छेदनासाठी किमान 75 मृतदेह मिळाले, परंतु ते थेट उष्णतेच्या लाटेशी जोडू शकले नाहीत, असे शर्मा यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. यापूर्वी, शवगृहात दररोज सात किंवा आठ मृतदेह येत होते. परंतु ही संख्या 20 च्या वर गेली आहे. दैनंदिन संख्येत होणारी वाढही त्यांनी 'अनपेक्षित' असल्याचे वर्णन केले. उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाबद्दल, सीएमओकडून चिंता व्यक्त करण्यात आली. हवामान अत्यंत तीव्र आहे यात शंका नाही आणि 'ही नेहमीची उष्णता नाही', असे ते म्हणाले.
'उष्णतेचा प्रभाव सर्वांवर सारखा नसतो. जे पूर्णपणे निरोगी आहेत ते ते सहन करू शकतात. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि झाडांखाली वेळ घालवला तर कदाचित तुम्हालाही उष्णता सहन करावी लागेल,' असे ते म्हणाले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2024 09:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

