Emergency Alert on Phone: तुमच्या फोनवरही आला आहे का भारत सरकारचा इमरजेंसी अलर्ट मेसेज? काय आहे याचा अर्थ? जाणून घ्या
भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टीमद्वारे पाठवलेला हा नमुना चाचणी संदेश आहे. कृपया या संदेशाकडे दुर्लक्ष करा कारण तुमच्याकडून कोणतीही कारवाई आवश्यक नाही. हा चाचणी संदेश संपूर्ण भारतातील आणीबाणी अलर्टद्वारे लागू केला जात आहे.
Emergency Alert on Phone: जर तुम्ही स्मार्टफोन यूजर असाल तर काही वेळापूर्वी तुम्हाला स्क्रीनवर मेसेज दिसला असेल. तथापि, आपल्याला याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. हा संदेश तुमच्या फोनच्या स्क्रीनवर मोठ्या आवाजात दिसला असेल. हा संदेश आपत्कालीन चेतावणी (Emergency Alert) चाचणीसाठी पाठवण्यात आला होता. भारत सरकारने अनेक स्मार्टफोनवर हा मजकूर संदेश पाठवून आपत्कालीन इशारा प्रणालीची चाचणी केली. अखेर हा मेसेज का पाठवण्यात आला असावा, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आम्ही या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत.
भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टीमद्वारे पाठवलेला हा नमुना चाचणी संदेश आहे. कृपया या संदेशाकडे दुर्लक्ष करा कारण तुमच्याकडून कोणतीही कारवाई आवश्यक नाही. हा चाचणी संदेश संपूर्ण भारतातील आणीबाणी अलर्टद्वारे लागू केला जात आहे. प्रणाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उद्दिष्ट सार्वजनिक सुरक्षा वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर सूचना देणे हे आहे. (हेही वाचा - Google Release AI Software Gemini: ChatGPT शी स्पर्धा करण्यासाठी,Google AL सॉफ्टवेअर जेमिनी रिलीज करण्याच्या प्रयत्नात)
भारत सरकारचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याची चाचणी घेत आहे. सरकारला यातून सार्वजनिक सुरक्षा वाढवायची आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा इशारा येत राहतो. भारत सरकार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने काम करत आहे.
तथापी, जर तुम्हाला हा मेसेज आला असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. त्सुनामी, भूकंप आणि पूर यांसारख्या परिस्थितींमध्ये सरकार आगाऊ इशारे पाठवते जेणेकरून लोकांना सतर्क राहता येईल.
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2023 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

