World Cup 2011: आजच्याच दिवशी विश्वचषकावर Team India ने कोरलं होतं आपले नाव. ऐतिहासिक कामगिरीला आज 12 वर्षे पूर्ण
या विश्वचषकात महत्त्वपुर्ण कामगिरी करणारा भारताचा फलंदाज युवराज सिंहने या विजयाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
भारताने आजच्याच दिवशी 2011 साली विश्वचषक जिंकला (World Cup 2011) होता. आजच्याच दिवशी टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वचषकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले होते. यापुर्वी 1983 साली कपिल देवच्या (Kapil Dev) नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर 2 एप्रिल 2011 साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने हा इतिहास रचला होता. या विश्वचषकात महत्त्वपुर्ण कामगिरी करणारा भारताचा फलंदाज युवराज सिंहने या विजयाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांने या संदर्भात एक पोस्ट केली आहे.
पहा ट्विट -
Determined & Unconquerable! #Throwback to this historic #WorldCup victory with this epic team 12 years back! 🇮🇳 🏆#WorldCup2011 #Throwback #12Years pic.twitter.com/ScwbfivP2z
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2023 10:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

