IND vs AUS 1st Semi-Final: सेमीफायनल सामन्यात टीम इंडिया काळी पट्टी घालून मैदानात का उतरली? यामागील जाणून घ्या कारण

मुंबईचे दिग्गज पद्माकर शिवलकर यांच्या निधनानंतर, टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हातावर काळ्या पट्ट्या बांधून उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी उतरले.

IND vs AUS 1st Semi-Final: सेमीफायनल सामन्यात टीम इंडिया काळी पट्टी घालून मैदानात का उतरली? यामागील जाणून घ्या कारण
Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Autralian Men's National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू मैदानात उतरताच त्यांच्या हातावर काळ्या पट्ट्या बांधल्याचे दिसून आले. यामागील कारण म्हणजे एक दिवस आधी मुंबईचे माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर (Mumbai cricketer Shri Padmakar Shivalkar Demise) यांचे निधन झाले होते. ते 84 वर्षांचे होते, ते 20 वर्षे स्थानिक स्पर्धांमध्ये मुंबईकडून खेळले. मुंबईचे दिग्गज पद्माकर शिवलकर यांच्या निधनानंतर, टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हातावर काळ्या पट्ट्या बांधून उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी उतरले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).