भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. बुधवारी या मैदानावरील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. या मालिकेत इंग्लंड 1-0 ने आघाडीवर आहे. जर टीम इंडिया हा सामना हरली तर ती मालिका गमावेल. अशा परिस्थितीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघ पुनरागमनाकडे डोळे लावून बसला आहे. दरम्यान, इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा डाव 16.2 षटकात केवळ 80 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 30 धावा केल्या. इंग्लंडकडून शार्लोट डीन, लॉरेन बेल, सोफी एक्लेस्टोन आणि सारा ग्लेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 20 षटकात 81 धावा करायच्या आहेत. (हे देखील वाचा: Team India: एकदिवसीय विजयात या भारतीय फलंदाजांनी या वर्षी 1 हजारहून अधिक केल्या धावा, पाहा आश्चर्यकारक आकडेवारी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)