औरंगाबाद जिल्ह्यातील Make In India अंतर्गत निर्मित व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त चुकीचे; केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पुरवण्यात आलेले मेक इन इंडिया (Make In India) अंतर्गत निर्मित काही व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. मात्र हे वृत्त निराधार आणि चुकीचे आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पुरवण्यात आलेले मेक इन इंडिया (Make In India) अंतर्गत निर्मित काही व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. मात्र हे वृत्त निराधार आणि चुकीचे असून, पूर्ण माहिती न घेताच प्रसिध्द करण्यात आले असल्याचे केंद्र सरकरने सांगितले आहे. औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये ज्योती सीएनसी या भारतीय कंपनीने 150 व्हेंटीलेटर्सचा पुरवठा ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गतच्या केला आहे. राज्यांना त्यांच्या विनंतीनुसार, या व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करण्यात आला आहे. या पुरवठादारांना पीएम केअर्स फंड मधून निधी देण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
There have been some media reports suggesting that ‘Make in India’ ventilators in Maharashtra's Aurangabad were not functioning optimally. These reports are baseless & incorrect, not supported by full information on the matter: Govt of India
— ANI (@ANI) May 14, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2021 10:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

