मुंबई सत्र न्यायालयाकडून Harshad Raoji Bhai Solanki आणि Mafat Manilal Gohil यांची सुटका करण्यात आली आहे. 21 वर्ष जुन्या प्रकरणाचा संबंध गुजरात मध्ये 2002 साली झालेल्या दंगलींशी आहे. गुजरातच्या गोध्रा कांडांमध्ये बेस्ट बेकरी कांड चा देखील समावेश होता. बेकरी चालवणाऱ्या शेख कुटुंबासह 14 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुजरात पोलिसांनी 21 जणांना आरोपी बनवून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.पण पुराव्याअभावी, वडोदरा येथील न्यायालयाने 2003 मध्ये सर्वांची निर्दोष मुक्तता केली, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2004 मध्ये पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करताना हा खटला महाराष्ट्रात वर्ग करण्याचे निर्देश दिले होते.
पहा ट्वीट
A Mumbai court acquits two of the accused- Harshad Raoji Bhai Solanki and Mafat Manilal Gohil- in the Best Bakery case pic.twitter.com/cysku5xrpI
— ANI (@ANI) June 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)