मुंबई-गोवा महामार्गावर 10 वर्षात 1,500 हून अधिक लोकांचा मृत्यू: Minister Ravindra Chavan

मुंबई-गोवा महामार्गावर एकूण 6,692 अपघात झाले आणि 1,512 लोकांना आपला जीव गमवावा लागला,

मुंबई-गोवा महामार्गावर 10 वर्षात 1,500 हून अधिक लोकांचा मृत्यू: Minister Ravindra Chavan
Death (Photo Credits-Facebook)

मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या 10 वर्षात 1,500 हून अधिक लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत ही माहिती दिली. पीटीआयनुसार, शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी लक्ष वेधून घेतलेल्या चर्चेदरम्यान चव्हाण यांनी लेखी उत्तरात डेटाचा उल्लेख केला. 2012 ते 2022 पर्यंत, मुंबई-गोवा महामार्गावर एकूण 6,692 अपघात झाले आणि 1,512 लोकांना आपला जीव गमवावा लागला, असे मंत्र्यांनी सांगितले. डिसेंबर 2023 पर्यंत महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2022 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).