पश्चिम बंगाल राज्यात सुरु असलेला हिंसाचार हा भाजप प्रयोजित आणि नियोजित असल्याचा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशात निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुका हारण्याची भीती भाजपला वाटते आहे. त्यामुळे निवडणुकींमध्य होणाऱ्या संभाव्य पराभवाची भीती आणि अनेक ठिकाणी सत्तेला होणारे नुकसान यामुळे भाजप दंगलीचा मार्ग अनुसरते. ज्या ज्या ठिकाणी भाजप सरकार कमकुवत आहे त्या ठिकाणीच दंगली केल्या जातात, सरकारे अडचणीत आणली जातात, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)