भारतीय रेल्वे कडून चालवल्या जाणार जम्मू- दिल्ली, उधमपूर-दिल्ली 3 विशेष ट्रेन्स
सध्या पाकिस्तान कडून नियंत्रण रेषेजवळ हल्ला केला जात आहेत. त्यामुळे अनेकांचे घराचे, दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
भारत-पाकिस्तान मधील तणावग्रस्त परिस्थितीनंतर आता भारतीय रेल्वे जम्मू- दिल्ली, उधमपूर-दिल्ली 3 विशेष ट्रेन्स चालवणार आहेत. सध्या पाकिस्तान कडून नियंत्रण रेषेजवळ हल्ला केला जात आहेत. यामधून नागरी वस्ती, दुकानं यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं चित्र आहे. या विशेष ट्रेन्स च्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवता येणार आहे. 12 अनारक्षित आणि 12 आरक्षित डबे असलेली 04612 ही गाडी सकाळी 10.45 वाजता जम्मूहून धावेल. वंदे भारत दुपारी 12.45 वाजता उधमपूरहून जम्मू आणि पठाणकोटमार्गे धावेल. जम्मूहून संध्याकाळी 7 वाजता आणखी एक पूर्णपणे आरक्षित विशेष गाडी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नक्की वाचा: India Pakistan War: सोशल मीडियावर अफवा, भारतातील विमानतळांवर प्रवेश बंदी; सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नाही.
भारतीय रेल्वे चालवणार विशेष ट्रेन्स
J&K: In the wake of the prevailing situation, #IndianRailways has planned to run special trains from Jammu and Udhampur. The train 04612, having 12 unreserved and 12 reserved coaches, will run at 10.45 AM from Jammu. Another 20 #VandeBharat will run at 12.45 PM from Udhampur via…
— All India Radio News (@airnewsalerts) May 9, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2025 10:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

