Mumbai Weather Alert: मुंबईचे तापमान वाढले, पारा आणखी चढण्याची शक्यता; उकाड्याने नागरिक कासावीस, राज्यात मात्र अवकाळीचे सावट
राज्याची राजधानी मुंबई शहरावतील उष्णता वाढू (Mumbai Weather Alert) लागली आहे. परिणामी उकाड्यामुळे नागरिकांची काहीली होत आहे. पाठिमागील दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मुंबई शहरात तापमानाची वाढ पुढचे दोन दिवस अशीच कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात मात्र काही ठिकाणी ढगाळ आणि पावसाच्या शक्यतेचे वातावरण आहे.
राज्याची राजधानी मुंबई शहरावतील उष्णता वाढू (Mumbai Weather Alert) लागली आहे. परिणामी उकाड्यामुळे नागरिकांची काहीली होत आहे. पाठिमागील दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मुंबई शहरात तापमानाची वाढ पुढचे दोन दिवस अशीच कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात मात्र काही ठिकाणी ढगाळ आणि पावसाच्या शक्यतेचे वातावरण आहे. ढगांची झालेली द्रोणीय स्थिती आणि खंडित वातस्थीती पावसाला पोषक वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी गारवा तर मुंबईत उन्हाळा वाढू शकतो. मुंबई शहरात आज आणि उद्या वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
हवामान बदलाचे अभ्यासक सांगतात की, ढगांची द्रोणीय स्थिती पश्चिमेकडे सरकत असल्याने राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता वाढू लागेल परिणामी खालच्या स्तरातून पूर्वेकडून येणारे वारे कमाल तापमानात वाढ करत अहे. ढगांची द्रोणीय स्थिती ही पावसाचा शिडकाव होण्यासाठी पुरक ठरते. त्यामुळे अशा स्थिती मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात. दुसऱ्या बाजूला मुंबईकरांना मात्र उन्हाच्या झळा आणि उकाड्याला सामोरे जावे लागू शकेल. (हेही वाचा, Mumbai Water Cut: मुंबई शहर पाणीकपात संदर्भात BMC द्वारे कारणांची मालिका, घ्या जाणून)
हवामान म्हणजे विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी असलेल्या वातावरणीय परिस्थितीचा संदर्भ. ज्यात तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग आणि दिशा, ढगांचे आवरण आणि पर्जन्यमान यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या सौर किरणोत्सर्गाचे प्रमाण, पृथ्वीचे परिभ्रमण, पृथ्वीच्या अक्षाला झुकणे आणि ग्रहावरील जमीन आणि पाण्याचे वितरण/प्रमाण यासह विविध घटकांचा हवामानावर परिणाम होतो. जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये त्यांच्या स्थानावर आणि प्रचलित वातावरणीय परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे हवामान निर्माण होते. पाहायला, अनुभवायला मिळते.
हवामानाचा मानवी कृती आणि नैसर्गिक वातावरणावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, चक्रीवादळ, चक्रीवादळ आणि पूर यासारख्या गंभीर हवामानाच्या घटनांमुळे मालमत्तेचे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होऊ शकते. वाहतूक आणि दळणवळणाचे जाळे यांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. अति तापमानाचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, विशेषत: असुरक्षित लोकसंख्येसाठी जसे वृद्ध किंवा दीर्घकालीन आरोग्य स्थितीमध्ये.
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2023 09:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

