Shiv Sena (UBT) Supports Rahul Gandhi: नरेंद्र मोदी ब्रँड संपला! राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासाठी शिवसेना (UBT) पक्षाचा पाठिंबा: संजय राऊत

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे जर नेतृत्व स्वीकारण्यास तयार असतील आणि पंतप्रधान (Prime Minister) बनू इच्छित असतील तर शिवसेना (UBT) पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

Shiv Sena (UBT) Supports Rahul Gandhi: नरेंद्र मोदी ब्रँड संपला! राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासाठी शिवसेना (UBT) पक्षाचा पाठिंबा: संजय राऊत
Sanjay Raut And Rahul Gandhi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे जर नेतृत्व स्वीकारण्यास तयार असतील आणि पंतप्रधान (Prime Minister) बनू इच्छित असतील तर शिवसेना (UBT) पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. राहुल गांधी हे भारताच्या युतीचा पंतप्रधान चेहरा आहेत का? असा सवाल विचारला असता प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "जर राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार असतील तर आम्ही आक्षेप का घेऊ? ते राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. ते लोकप्रिय आहेत. आपण सर्वजण त्याच्यावर प्रेम करतो. दरम्यान, नरेंद्र मोदी ब्रँड संपला आहे. त्यामुळे मोदी गॅरेंटीचेही विसर्जन झाले असल्याचे राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचा नैतिक पराभव

इंडिया आघाडी पूर्णपणे एकत्र राहिली, एकत्र लढली. आमच्या कोणतेही मतभेद नाहीत. सर्वांनी एकदिलाने काम केल्यानेच भाजपला सत्तेतून निर्माण झालेला अहंकार मोडून काढता आला, असे संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तर नैतीक पराभव झालाच आहे पण त्यांचा राजकीय पराभवसुद्धा झाला आहे. 'मोदी गॅरेंटी'च्या नावाखाली त्यांनी 400 पार जागा मिळविण्याचे स्वप्न पाहिले. पण देशातील जनतेने त्यांना जागा दाखवली. ज्या राम मंदिराच्या नावावरुन राजकारण केले त्या अयोध्येतील जागा त्यांना राखता आली नाही. इतकेच नव्हे तर स्वत: नरेंद्र मोदी मतमोजणी सुरु झाली तेव्हा पिछाडीवर होते. याचाच अर्थ देशातील जनता त्यांना नाकारते आहे हे सिद्ध झाले आहे, असे राऊत म्हणाले. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024 Results: 'स्वतःला देव मानणाऱ्या PM Narendra Modi यांचे नाक कापले गेले'; लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया)

इंडिया आघाडीची दिल्ली येथे बैठक

दरम्यान, इंडिया आघाडीची एक बैठक आज (5 जून) दिल्ली येथे पार पडत आहे. या बैठकीत राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेसाठी दावा करायचा की नाही याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीस महाराष्ट्रातील प्रमुख नेते शरद पवार, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बिहारपासून तामिळनाडूपर्यंतचे सर्व प्रमुख विरोधी नेते उपस्थित राहणार आहेत. यात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेते तेजस्वी यादव, शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत आणि इतर अनेकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याप्रमाणेच विस्तारा हे विमान पटनाहून घेणार आहेत. तृणमूल काँग्रेस आपले युवा नेते अभिषेक बॅनर्जी यांना दिल्लीतील बैठकीसाठी पाठवणार आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास ते कोलकाता येथून निघण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, INDIA Bloc Meeting: सत्ता स्थापनेसाठी दावा? इंडिया आघाडी सक्रीय; दिल्लीमध्ये खलबतं, शरद पवार, सुप्रिया सुळे राजधानीकडे रवाना)

शरद पवार, सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना

इंडिया आगाडीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) नेते शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे आज सकाळी मुंबई विमानतळावरून निघताना दिसले. NCP (SP) ने महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागा जिंकल्या आहेत आणि सुळे यांनी 1,58,333 मतांच्या फरकाने बारामती राखण्यात यश मिळवले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे देखीलचेन्नई विमानतळावरून आज सकाळी दिल्लीकडे निघताना दिसले. इंडिया आगाडीच्या बैठकीपूर्वी ते दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये त्यांचा पक्ष द्रमुकने २२ जागा जिंकल्या. बुधवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला या नेत्यांशिवाय काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

व्हिडिओ

अखिलेश यादव उपस्थित राहणार की नाही?

इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आतापर्यंत विरोधकांच्या बैठकीला आपली उपस्थिती राहणार की नाही याबाबत निश्चित माहिती दिली नाही. कदाचित ते कनौज मतदारसंघात असतील आणि तेथील समर्थकांना आणि लोकांना भेटतील त्यानंतर दिल्लीला रवाना होऊ शकतील.

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2024 11:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).