Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. हाती आलेले निकाल पाहता 2024 आणि 2019 च्या तुलनेत भाजपने निराशाजनक कामगिरी केली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, ‘मोदींनी व्रत केले, ध्यान केले मात्र देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाकारले आहे. मोदींना निरोप दिला आहे. भाजपने याधी 2014 आणि 2019 मध्ये एकट्याने बहुमत प्राप्त केले होते. मात्र आता 2024 मध्ये भाजपला बहुमत न मिळणे हा पीएम मोदी व अमित शाह यांचा पराभव आहे. इंडिया आघाडीने मेहनत घेऊन पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा अहंकार उद्ध्वस्त केला आहे. आता मोदींचे सरकार बनणार नाही. सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, कारण ते आणि भाजप हरले आहेत. स्वतःला देव मानणाऱ्या पीएम नरेंद्र मोदी यांचे नाक कापले गेले आहे. मुंबईमध्ये, महाराष्ट्रात आम्ही मोदींना अडवले आहे.’ (हेही वाचा: Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निकालात ठाकरेंच्या जागा आघाडीवर, सुषमा अंधारे यांचा कार्यकर्त्यांसोबत जल्लोष)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)