Devendra Fadnavis On Sharad Pawar: शरद पवारांनी केंद्राची चिंता करणे सोडून महाराष्ट्रासमोरील समस्यांवर लक्ष केंद्रित करावे, देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पवारांच्या सल्ल्याची गरज आहे. महाराष्ट्रासमोर अनेक समस्या आहेत, मग ते शेतकऱ्यांचे संकट असो वा सर्वसामान्य नागरिकांचे. पवारांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याने ठाकरेंना महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करावे.

Devendra Fadnavis On Sharad Pawar: शरद पवारांनी केंद्राची चिंता करणे सोडून महाराष्ट्रासमोरील समस्यांवर लक्ष केंद्रित करावे, देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
Devendra Fadnavis And Sharad Pawar (Pic Credit - Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्राची चिंता करणे सोडून महाराष्ट्रासमोरील समस्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी केले. फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पवारांच्या सल्ल्याची गरज आहे. महाराष्ट्रासमोर अनेक समस्या आहेत, मग ते शेतकऱ्यांचे संकट असो वा सर्वसामान्य नागरिकांचे. पवारांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याने ठाकरेंना महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करावे. महाराष्ट्रातील परिस्थिती चिंतेचे कारण आहे. हेही वाचा शिवसेनेकडून Uddhav Thackeray च्या सभेच्या टिझर मध्ये Raj Thackeray यांच्या सभेतील गर्दीचे फोटो' मनसे प्रवक्ते Gajanan Kale यांचा दावा

ते म्हणाले की, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरील देशद्रोहाच्या आरोपांच्या गैरवापराशी संबंधित असो किंवा धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याबद्दल छळ झालेल्या कोणत्याही व्यक्तीशी असो, महाविकास आघाडी सरकार (MVA) निर्दयीपणे सत्तेचा गैरवापर करत आहे. पवारांनी राज्याच्या कारभारावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याबद्दल फडणवीस म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत हे मान्य आहे का? हे नियमांचे निर्लज्जपणे उल्लंघन होत नाही का?

(The above story first appeared on LatestLY on May 11, 2022 05:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).