तिवरे धरणफुटी प्रकरणी आतापर्यंत 20 मृतदेह हाती, अद्याप तीन जण बेपत्ता
रत्नागिरी (Ratnagiri) येथील तिवरे धरणफुटी (Tiware Dam) प्रकरणी आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. मात्र अद्याप तीन जण बेपत्ता असल्याने शोधमोहिम सुरुच आहे.
रत्नागिरी (Ratnagiri) येथील तिवरे धरणफुटी (Tiware Dam) प्रकरणी आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर आज (7 जुलै) एका दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह एनडीआरफच्या जवांनांच्या हाती लागला आहे. मात्र अद्याप तीन जण बेपत्ता असल्याने शोधमोहिम सुरुच आहे.
राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तिवरे धरम वाहू लागले आहे. तसेच धरणाला भगदाड पडत असल्याचे दिसून येताच गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मात्र अखेर तासाभरात गावात पाणी शिरुन त्याच्या प्रवाहात घरांसह काहीजण वाहून गेल्याची दुर्घटना घडली. यामध्ये 22-24 जण वाहून गेल्याचे सांगण्यात येत होते. तर आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह सापडले आहेत.
#UPDATE: One more body recovered in the search operation this morning. Total 20 bodies have been recovered so far. 3 more are till missing. #TiwareDam https://t.co/NFXxV52aKt
— ANI (@ANI) July 7, 2019
तर तिवरे धरणफुटी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत याबद्दल चौकशीचे आदेश दिले. मात्र जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरण हे खेकड्यांनी भोक पाडल्याने फुटले असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यांच्या या स्पष्टीकरणावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2019 03:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

